शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Vidhan Sabha 2019 : वेगळे लढले तरी भाजपाची चांदी, शिवसेनेची 'मंदी'; आघाडीला अत्यल्प संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 19:23 IST

आघाडीची घोषणा आधीच झालेली असताना शिवसेनेने युतीसाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. आघाडीची घोषणा झालेली असली तरीही युतीचे मात्र भिजत घोंगडे आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून खलबते सुरू असून दोन्हीकडच्या नेत्यांकडून युती तुटण्याची वक्तव्ये, संकेत देण्यात येत आहेत. तर भाजपाने समसमान जागा न देता 120 च्या आसपास जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने शिवसेनेमध्ये नाराजी आहे. याशिवाय भाजपाच्या इनकमिंगमुळे शिवसेनेच्या जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपा स्वबळावर लढणार की शिवसेनेसोबत युती करणार याची घोषणा येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर शिवसेनेने युतीसाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 

आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभुमीवर एबीपीमाझाने सीव्होटरसोबतचा सर्व्हे जारी केला आहे. यामध्ये शिवसेना, भाजपा एकत्र लढल्यास महायुतीला 205 जागा आणि महाआघाडीला 55 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर इतर पक्ष-अपक्षांना २८ जागा मिळणार आहेत. मात्र, युती झालीच नाही तर भाजपाचाच फायदा असल्याचे यामध्ये समोर आले आहे. 

युती झाली नाही तर भाजपाला 288 पैकी 144 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपाची सत्ता स्वबळावर येण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला केवळ 39 जागा दाखविण्यात आल्या आहेत. मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने याचा फटका शिवसेनेला बसणार असून मनसेला मात्र भोपळाही फोडता येणार नसल्याचे दिसत आहे. तर आघाडी तुटल्यास काँग्रेसला 21 आणि राष्ट्रवादीला 20 जागा मिळणार आहेत. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता न आल्यास इतर पक्ष आणि अपक्षांची चांदी होणार आहे. त्यांना या सर्व्हेमध्ये 64 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भाजपाची सत्ता येईल असे ५५ टक्के लोकांचे मत आहे. आणि शिवसेनेच्या पारड्यात 8 टक्केच लोकांनी मते टाकली आहेत. काँग्रेसची सत्ता येईल असे ११.९ टक्के लोकांना वाटत आहे. 

झी 24 तास काय म्हणतो...दुसरीकडे झी 24 तासने केलेल्या प्री एक्झिट पोलमध्ये याच्या उलट स्थिती दिसत आहे. भाजपाला यामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे म्हटले आहे. युती झाल्यास भाजपाला 143, शिवसेनेला 83, काँग्रेसला 26, राष्ट्रवादीला 26 आणि इतरांना 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

तर युती आणि आघाडी न झाल्यास भाजपाला गेल्या वेळ इतकेच बहुमत मिळणार असून 122 जागांवर भाजपाचे आमदार निवडून येणार आहेत. तर शिवसेनेला 52, काँग्रेसला 48, राष्ट्रवादीला 45 आणि इतरांना 21 जागा मिळतील असे या सर्व्हेमध्ये दिसत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस