शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Vidhan sabha 2019 : सुवर्णत्रिकोणातच नाटकं करायची काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:16 AM

निवडणूक परत एकदा वाजतगाजत आली आहे. घरीदारी, नाक्यावर, टीव्हीच्या पडद्यावर चर्चा सुरु झाली आहे. कुणी जुन्या घरातून नव्या घरात येत आहेत.

- सदानंद जोशीनिवडणूक परत एकदा वाजतगाजत आली आहे. घरीदारी, नाक्यावर, टीव्हीच्या पडद्यावर चर्चा सुरु झाली आहे. कुणी जुन्या घरातून नव्या घरात येत आहेत. तिकीटासाठी कुणी दाराशी थांबत, कुणी खिडकीतून डोकावत वाट पाहात आहेत. निकालानंतर नवा गडी, राज्य करेल किंवा जुना गडी परत राज्यावर येईल; पण प्रत्येकाने मतदान करण्यापूर्वी आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचा विचार करायला हवा. शेतकरी वर्षानुवर्षे नुसता आश्वासनांवर जगतोय. त्यानं पिकविलेल्या मालाला भाव ठरवण्याचा त्याला अधिकार नाही. दलाल भाव ठरवणार, मालामाल होणार आणि आमचा बळीराजा दोरीत मान अडकवणार. त्याला चोवीस तास वीज कधी मिळणार? हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागणाºया महिलांची वणवण कधी थांबणार? माताभगिनींची ही वणवण थांबविण्याची आणि बळीराजाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची जबाबदारी आता सत्तेवर येणाºया सरकारची आहे. रस्ते चौपदरी, सहापदरी होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. देशाचा प्रगतीपथ विस्तारायलाच हवा; पण मग ग्रामीण भागातले रस्ते खड्ड्यांतच राहणार का? सद्यपरिस्थितीत त्यांची एवढी दुर्दशा झाली आहे की त्यांना रस्ते तरी कसे म्हणायचे असा प्रश्न पडतो. गावखेड्यात राहणाऱ्यांची नशिबी भले चौपदरी रस्ते नसतील पण आहे त्यामार्गावरून तरी सुखानं प्रवास करता यायला हवा. निधी कमी पडू देणार नाही, हे घोषणेतले वाक्य आता कृतीत आणून ग्रामीण भागाला चांगले रस्ते मिळावेत, ही साधी अपेक्षा तरी पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या. विद्यार्थ्यांच्या सुविधांकडेही लक्ष द्यायला हवे. त्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे हलके झाले की शासनाच्या डोक्यावरचा भारही हलका होईल.सामाजिक समस्यांसंदर्भातील अपेक्षा मांडत असतानाच सांस्कृतिक क्षेत्रातील अडीअडचणींचा ऊहापोह करणंही तितकचं आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात ऊर्जा आणि दिलासा देणाºया विविध कलांचे महत्त्व तितकेच अनन्यसाधारण आहे. सध्या उपलब्ध असलेल्या काही किंवा बºयाचशा नाट्यगृहांची अवस्था चिंताजनक आहे. नाट्यगृहांची स्वच्छता, अस्वच्छ टॉयलेट्स ह्यावर तक्रारी करून कलाकार थकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक ह्यातच नाटक शिल्लक राहिलंय काय, असा प्रश्न येतो. बाहेरगावालाही नाट्यगृहांची स्थिती याहून वेगळी नाही. मग कलाकारांनी नाटकांचे दौरे ह्या सुवर्णत्रिकोणातच करुन बाहेरगावी जाणे थांबविले तर त्यांचा काय दोष? तेव्हा आधी हातात आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं आणि नवीन नाट्यगृहं आता ३०० ते ३५० प्रेक्षक बसतील अशीच बांधणं हिताचं आहे.पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील मॉल्समध्ये पाच-सहा छोटी सिनेमाघरं आहेत तेथेच एक खास नाटकासाठी म्हणून मिनी थिएटर करता येईल का, याचाही विचार गांभीर्याने करायला हवा. नाट्यगृहांमध्ये दिसेनासी झालेली तरुणाई कदाचित अशा मॉलमधील अत्याधुनिक थिएटरमध्ये येऊ लागेल. हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या बक्षिसांच्या रकमेत आता बºयापैकी वाढ झाली आहे, परंतु नाटकाच्या सादरीकरणापोटी मिळणारी रक्कम पुरेशी नाही. त्यात अजूनही लक्षणीय सुधारणा व्हायला हवी. प्रायोगिक नाटक चळवळीच्या पाठिशी शासनाने उभे राहायला हवे. कारण ही चळवळ नाटक जिवंत ठेवणारी आहे. यातूनच रंगभूमी, चित्रपटसृृष्टीला अनेक सक्षम कलावंत लाभले आहेत. सिनेमॅक्स मराठी चित्रपटांना, त्यांना मिळणाºया शोबाबत प्राधान्य द्यायला हवे. तसेच राष्टÑीय चित्रपट पुरस्कार विजेते मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. महत्त्वाचे म्हणजे, सिनेमा आणि नाटक यावर सेन्सॉरचे वाढलेलं अनावश्यक ओझं आता कमी करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.(लेखक हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019