शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:23 IST

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीत बंडखोरी झाली असली, तरी बंडखोरांचे सर्वाधिक आव्हान महायुतीपुढे आहे. २७ मतदारसंघांत तब्बल ११४ बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले असून, त्यांना शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर ‘हॉटलाइन’वर होते, तर ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत होता.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती. पैकी ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘ए-बी’ फॉर्म वाटपचा घोळ सुरू होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांना बंडखोरांना रोखण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

महायुतीत भाजप १६४ आणि शिवसेना १२४ असे जागा वाटप झाले आहे. यावेळी भाजपमध्ये आयात उमेदवारांची ‘मेघाभरती’ झाल्याने, या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी स्वपक्षाच्या १८ आमदारांना नारळ द्यावा लागला आहे. उमेदवारी नाकारली गेलेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. युती होईल की नाही, याबाबत परवापर्यंत शंका असल्याने शिवसेनेने २८८ मतदारसंघात तयारी केली होती. शिवसेनेला या ‘आगाऊ’ तयारीचाच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काही अपवाद वगळता शिवसेनेच्या बहुसंख्य उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले आहेत.

२०१४ ची निवडणूक भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढविली. त्यामुळे दोन्ही पक्षांत सर्वच मतदारसंघात यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी होती. महायुतीतील रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती या मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातून जागा दिल्याने नाराज स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना आणि शिवसेनेच्या उमेदवारविरुद्ध भाजपचे बंडखोर असे चित्र आहे.या प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हानमंत्री विजयकुमार देशमुख, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, मदन येरावार, आ. जयप्रकाश मुंदडा, आमजी आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. भीमराव तापकीर, महापैर मुक्ता टिळक, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. विजयराव औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. राजेंद्र पाटणी, आ. सीमा हिरे, माजी आ. दिलीप सोपल या प्रमुख उमेदवारांविरोधात बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे.बंडखोरांना मुख्यमंत्र्यांचा इशारा : ज्यांनी बंडखोरी केली आहे ते माघारही घेतील, पण जे घेणार नाहीत, त्यांचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. बंडखोर आमचा असो की शिवसेनेचा, त्याला आधी समजावून सांगू अन् नाहीच ऐकलं तर त्याची जागा दाखवू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.आघाडीतही बिघाडी :काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीतही काही ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले आहे, तर या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्टÑवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे. सोलापूरचा हा तिढा सुटला नाही, तर त्याचे पडसाद इतर मतदारसंघात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस