शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:23 IST

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीत बंडखोरी झाली असली, तरी बंडखोरांचे सर्वाधिक आव्हान महायुतीपुढे आहे. २७ मतदारसंघांत तब्बल ११४ बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले असून, त्यांना शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर ‘हॉटलाइन’वर होते, तर ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत होता.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती. पैकी ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘ए-बी’ फॉर्म वाटपचा घोळ सुरू होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांना बंडखोरांना रोखण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

महायुतीत भाजप १६४ आणि शिवसेना १२४ असे जागा वाटप झाले आहे. यावेळी भाजपमध्ये आयात उमेदवारांची ‘मेघाभरती’ झाल्याने, या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी स्वपक्षाच्या १८ आमदारांना नारळ द्यावा लागला आहे. उमेदवारी नाकारली गेलेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. युती होईल की नाही, याबाबत परवापर्यंत शंका असल्याने शिवसेनेने २८८ मतदारसंघात तयारी केली होती. शिवसेनेला या ‘आगाऊ’ तयारीचाच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काही अपवाद वगळता शिवसेनेच्या बहुसंख्य उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले आहेत.

२०१४ ची निवडणूक भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढविली. त्यामुळे दोन्ही पक्षांत सर्वच मतदारसंघात यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी होती. महायुतीतील रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती या मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातून जागा दिल्याने नाराज स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना आणि शिवसेनेच्या उमेदवारविरुद्ध भाजपचे बंडखोर असे चित्र आहे.या प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हानमंत्री विजयकुमार देशमुख, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, मदन येरावार, आ. जयप्रकाश मुंदडा, आमजी आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. भीमराव तापकीर, महापैर मुक्ता टिळक, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. विजयराव औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. राजेंद्र पाटणी, आ. सीमा हिरे, माजी आ. दिलीप सोपल या प्रमुख उमेदवारांविरोधात बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे.बंडखोरांना मुख्यमंत्र्यांचा इशारा : ज्यांनी बंडखोरी केली आहे ते माघारही घेतील, पण जे घेणार नाहीत, त्यांचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. बंडखोर आमचा असो की शिवसेनेचा, त्याला आधी समजावून सांगू अन् नाहीच ऐकलं तर त्याची जागा दाखवू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.आघाडीतही बिघाडी :काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीतही काही ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले आहे, तर या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्टÑवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे. सोलापूरचा हा तिढा सुटला नाही, तर त्याचे पडसाद इतर मतदारसंघात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस