शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:23 IST

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीत बंडखोरी झाली असली, तरी बंडखोरांचे सर्वाधिक आव्हान महायुतीपुढे आहे. २७ मतदारसंघांत तब्बल ११४ बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले असून, त्यांना शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर ‘हॉटलाइन’वर होते, तर ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत होता.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती. पैकी ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘ए-बी’ फॉर्म वाटपचा घोळ सुरू होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांना बंडखोरांना रोखण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

महायुतीत भाजप १६४ आणि शिवसेना १२४ असे जागा वाटप झाले आहे. यावेळी भाजपमध्ये आयात उमेदवारांची ‘मेघाभरती’ झाल्याने, या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी स्वपक्षाच्या १८ आमदारांना नारळ द्यावा लागला आहे. उमेदवारी नाकारली गेलेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. युती होईल की नाही, याबाबत परवापर्यंत शंका असल्याने शिवसेनेने २८८ मतदारसंघात तयारी केली होती. शिवसेनेला या ‘आगाऊ’ तयारीचाच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काही अपवाद वगळता शिवसेनेच्या बहुसंख्य उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले आहेत.

२०१४ ची निवडणूक भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढविली. त्यामुळे दोन्ही पक्षांत सर्वच मतदारसंघात यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी होती. महायुतीतील रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती या मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातून जागा दिल्याने नाराज स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना आणि शिवसेनेच्या उमेदवारविरुद्ध भाजपचे बंडखोर असे चित्र आहे.या प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हानमंत्री विजयकुमार देशमुख, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, मदन येरावार, आ. जयप्रकाश मुंदडा, आमजी आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. भीमराव तापकीर, महापैर मुक्ता टिळक, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. विजयराव औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. राजेंद्र पाटणी, आ. सीमा हिरे, माजी आ. दिलीप सोपल या प्रमुख उमेदवारांविरोधात बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे.बंडखोरांना मुख्यमंत्र्यांचा इशारा : ज्यांनी बंडखोरी केली आहे ते माघारही घेतील, पण जे घेणार नाहीत, त्यांचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. बंडखोर आमचा असो की शिवसेनेचा, त्याला आधी समजावून सांगू अन् नाहीच ऐकलं तर त्याची जागा दाखवू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.आघाडीतही बिघाडी :काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीतही काही ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले आहे, तर या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्टÑवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे. सोलापूरचा हा तिढा सुटला नाही, तर त्याचे पडसाद इतर मतदारसंघात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस