शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 20:22 IST

लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर स्पष्ट मत मांडले.

मुंबई/परळी-  राजकीय वाटचालीसह पक्षात होणारी घालमेल आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल पक्षाला काय वाटतं, यासह विविध विषयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी परळी मतदारसंघात झालेला पराभव आणि भविष्यातील वाटचाल, यावरही स्पष्ट भूमिका मांडली. लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपाने गोपीनाथ मुंडेंसाठी पाहिजे तेवढ न केल्यानं खटकतं का? पंकजा मुंडेंची 'मन की बात'

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र होते. तसेच, अशी चर्चा होती की, भाजपचीही काही समीकरणे धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळेच तुमचा पराभव झाला का? यावर पंकजा म्हणाल्या, असं म्हणता येणार नाही. विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची ताकत वाढवली होती. आम्ही दोघे वेगळे लढलो असतो, तर आम्हाला हरवणे सोपी गोष्ट नसती. आमचे विचार वेगळे असले तरी, आमचे गुरू गोपीनाथ मुंडे आहेत.

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, भविष्यात दोघे एकत्र आलेले दिसतील का? यावर त्या म्हणाल्या, आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षातून, वेगळ्या विचारधारेतून येतो, त्यामुळे आमच्या दोघांनाही एका बाजुला जाणे सोपे नाही. आता त्यांचा पक्ष आमच्याशी जोडला गेला आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरही काही आव्हाने असणार आहेत. जी मते त्यांना सहज मिळणारी होती, ती आता त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे आमच्या दोघांच्या पक्षातील नेते काय ठरवतील, ते आता सांगणे कठीण आहे. 

परळी मतदारसंघ सोडणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी असा कुठलाही विचार करत नाही. तो मतदारसंघ माझ्यासाठी खुप भावनिक आहे. मुंडे साहेबांचा तो मतदारसंघ आहे. तिथूनच मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले, मुंडे साहेबांच्या काळात मी तिथे कामे केली आहेत. माझ्या कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा आहे. मी पराभूत झाले पण 95 हजार मते घेऊन पराभूत झाले. ह्या 95 हजार लोकांना मी वाऱ्यावर सोडू नाही शकत. 

"मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री"; पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सोबत आले आहेत, त्यामुळे पुढील विधानसभेत भाजपने परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांना सोडल्यावर तुमचा पवित्रा काय असेल? या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, मला वाटत नाह की, भाजप माझ्याशी चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेईल. भाजपचा असा स्वभाव, संस्कृती नाही. असा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा नक्की करतील. सध्या माझ्याशी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. परळीची जागा सोडायचा विषयच येत नाही. माझ्याशी किंवा धनंजयशी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे अशी चर्चा झाल्यानंतर पाहू, अशी स्पष्टोकी पंकजा यांनी दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसparli-acपरळीElectionनिवडणूक