शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

VIDEO : गणेशोत्सवासाठी सर्रासपणे पीओपी मुर्तीचा वापर

By admin | Updated: August 27, 2016 15:36 IST

गणेशोत्सव जवळ येत असून अनेक सामाजिक संस्था पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मूर्ती घडविण्यास सांगत आहेत.

- ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -  गणेश उत्सव जवळ येऊ लागला आहे. यास्तव विविध सामाजिक संस्था आणि शासनाच्यावतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मूर्ती घडविण्यासह, निर्माल्याचे विसर्जन पाण्यान करता त्याची रितसर विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु त्यांच्या आवाहनाचा कसलाही परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी केवळ प्लास्टर आॅफ पॅरिसपासूनच मूर्ती बनविण्याचे काम सुरू असल्याचे आढळत आहे. 
गणेशोत्सव हा महाराष्ट्राबरोबरच देशाच्या अनेक भागातील धार्मिक, सांस्कृतिक महोत्सव आहे. परंतु या महोत्सवाचे स्वरूप अलिकडे फारच बदलून गेले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीची संख्या वाढली आहे. पूर्वी मूर्तीकार शाडूच्या मूर्ती तयार करत असत. त्या मूर्तींना दिलेले रंगही साधे असत. परंतु सार्वजनिक गणेश मंडळे वाढली आणि गणपतीच्या मूर्तींची मागणीही प्रचंड वाढली. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार मूर्ती बनवणे, मूर्तीकारांनाही अशक्य होऊन बसले. त्यावर उपाय म्हणजे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणे. या मूर्ती तयार करण्यास फार वेळ लागत नाही. त्यातच वजनाला हलक्या आणि मातीच्या मूर्तीपेक्षा तुलनेने निम्म्या किमतीत मिळत असल्याने पीओपीच्या मूर्ती मोठया प्रमाणात तयार व्हायला लागल्या आणि त्यांची विक्रीही प्रचंड वाढली. पीओपीवर रंगही छान बसतात आणि ती मूर्ती अधिक आकर्षक दिसते. म्हणून त्याच मूतीर्ची खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. लोकांना त्यांचे दुष्परिणाम मोठे आहेत. या मूर्ती पर्यावरणदृष्टया अतिशय घातक असतात याची माहिती आता लोकांना सांगण्याची गरजही राहिली नाही. पीओपी पाण्यात विरघळत नसल्याने अशा मूर्तीचा गाळ विहीरी, नद्या, तलाव आदि जलाशयांच्या तळात साचतो. त्यामुळे तलाव, विहिरीतील पाण्याखालचे जीवंत झरे बंद होतात. प्लास्टर आॅफ पॅरिसचा थर पाण्यामध्ये तयार होतो आणि जलाशये उथळ होतात. नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलाशयाची क्षमता कमी झाल्यामुळे त्यात पाणी साठत नाही. थोडयाशा पावसाने जलाशये भरतात आणि भरपूर पाणी साठवण्याऐवजी वाहून जाते. त्याशिवाय गणेश मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होऊन जलचरांना धोका निर्माण होतोे,असे पीओपीचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र सरकारकडे अशा मूर्तीवर बंदी घालावी, अशी मागणीही केली होती. परंतु महाराष्ट्रात त्या दृष्टीने हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आजही अनेक मूर्तीकार सर्रासपणे प्लास्टरच्या मूर्ती घडविण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात थेट मूर्तीकारालाच विचारले असता मातीची फुटाची मूर्ती घडविणे कठीण, माती मिळविणेही कठीण आणि एवढे सगळे करूनही मातीची मूर्ती बनविली, तर साधारण अडीच फू ट मातीची मूर्ती ही ८ ते ९ हजारांची असते, तर त्याहून दुप्पट उंचीची मूर्ती त्यापेक्षा कमी किंमत असल्याने लोक मातीची मूर्ती विकत घेत नाहीत. त्यामुळे आम्ही मातीच्या मूर्ती घडवून उपाशी मरावे काय, असे त्याने सांगितले. तथापि, जलप्रदूषण पर्यावरण रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारनेही पीओपीवर बंदी घालणे, ही आता काळाची गरज बनली आहे.