शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गणेशोत्सवासाठी सर्रासपणे पीओपी मुर्तीचा वापर

By admin | Updated: August 27, 2016 15:36 IST

गणेशोत्सव जवळ येत असून अनेक सामाजिक संस्था पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मूर्ती घडविण्यास सांगत आहेत.

- ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -  गणेश उत्सव जवळ येऊ लागला आहे. यास्तव विविध सामाजिक संस्था आणि शासनाच्यावतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मूर्ती घडविण्यासह, निर्माल्याचे विसर्जन पाण्यान करता त्याची रितसर विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु त्यांच्या आवाहनाचा कसलाही परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी केवळ प्लास्टर आॅफ पॅरिसपासूनच मूर्ती बनविण्याचे काम सुरू असल्याचे आढळत आहे. 
गणेशोत्सव हा महाराष्ट्राबरोबरच देशाच्या अनेक भागातील धार्मिक, सांस्कृतिक महोत्सव आहे. परंतु या महोत्सवाचे स्वरूप अलिकडे फारच बदलून गेले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीची संख्या वाढली आहे. पूर्वी मूर्तीकार शाडूच्या मूर्ती तयार करत असत. त्या मूर्तींना दिलेले रंगही साधे असत. परंतु सार्वजनिक गणेश मंडळे वाढली आणि गणपतीच्या मूर्तींची मागणीही प्रचंड वाढली. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार मूर्ती बनवणे, मूर्तीकारांनाही अशक्य होऊन बसले. त्यावर उपाय म्हणजे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणे. या मूर्ती तयार करण्यास फार वेळ लागत नाही. त्यातच वजनाला हलक्या आणि मातीच्या मूर्तीपेक्षा तुलनेने निम्म्या किमतीत मिळत असल्याने पीओपीच्या मूर्ती मोठया प्रमाणात तयार व्हायला लागल्या आणि त्यांची विक्रीही प्रचंड वाढली. पीओपीवर रंगही छान बसतात आणि ती मूर्ती अधिक आकर्षक दिसते. म्हणून त्याच मूतीर्ची खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. लोकांना त्यांचे दुष्परिणाम मोठे आहेत. या मूर्ती पर्यावरणदृष्टया अतिशय घातक असतात याची माहिती आता लोकांना सांगण्याची गरजही राहिली नाही. पीओपी पाण्यात विरघळत नसल्याने अशा मूर्तीचा गाळ विहीरी, नद्या, तलाव आदि जलाशयांच्या तळात साचतो. त्यामुळे तलाव, विहिरीतील पाण्याखालचे जीवंत झरे बंद होतात. प्लास्टर आॅफ पॅरिसचा थर पाण्यामध्ये तयार होतो आणि जलाशये उथळ होतात. नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलाशयाची क्षमता कमी झाल्यामुळे त्यात पाणी साठत नाही. थोडयाशा पावसाने जलाशये भरतात आणि भरपूर पाणी साठवण्याऐवजी वाहून जाते. त्याशिवाय गणेश मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होऊन जलचरांना धोका निर्माण होतोे,असे पीओपीचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र सरकारकडे अशा मूर्तीवर बंदी घालावी, अशी मागणीही केली होती. परंतु महाराष्ट्रात त्या दृष्टीने हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आजही अनेक मूर्तीकार सर्रासपणे प्लास्टरच्या मूर्ती घडविण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात थेट मूर्तीकारालाच विचारले असता मातीची फुटाची मूर्ती घडविणे कठीण, माती मिळविणेही कठीण आणि एवढे सगळे करूनही मातीची मूर्ती बनविली, तर साधारण अडीच फू ट मातीची मूर्ती ही ८ ते ९ हजारांची असते, तर त्याहून दुप्पट उंचीची मूर्ती त्यापेक्षा कमी किंमत असल्याने लोक मातीची मूर्ती विकत घेत नाहीत. त्यामुळे आम्ही मातीच्या मूर्ती घडवून उपाशी मरावे काय, असे त्याने सांगितले. तथापि, जलप्रदूषण पर्यावरण रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारनेही पीओपीवर बंदी घालणे, ही आता काळाची गरज बनली आहे.