शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

VIDEO : वृक्षदानातून ते फुलवितात निसर्गाचा ‘वसंत’

By admin | Updated: August 15, 2016 12:23 IST

चंद्रपुरातील एका निसर्गवेडय़ाने निसर्गातूनच घेवून निसर्गासाठीच नागरिकांना दान करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षापासून चालविला आहे.

गोपालकृष्ण मांडवकर
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. १५ -  ‘आपणासी जे जे ठावे, ते इतरांशी सांगावे’ असे संतवचन आहे. या नुसार अनेकजण आपल्या संचयातून इतरांना दान देत असतात. मात्र चंद्रपुरातील एका निसर्गवेडय़ाने निसर्गातूनच घेवून निसर्गासाठीच नागरिकांना दान करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षापासून चालविला आहे. 
वसंत तुकाराम घुगरे असे त्यांचे नाव. नावातच ‘वसंत’ असलेल्या या ध्येयवेडय़ाने वसुंधरेचा वसंत सदैव फुलता पाहण्याचे स्वप्न उरी बाळगले आहे. त्या स्वयंप्रेरणोतून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी नागरिकांना वृक्षदान करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. मूल तालुक्यातील जुनासुर्ला हे त्यांचे गाव. मुळात झाडीपट्टीतील गावात त्यांचे बालपण गेल्याने निसर्गाशी त्यांची जबरदस्त दोस्ती आहे. पुढे पोटापाण्यासाठी ते चंद्रपुरात स्थायिक झाले. येथील रामनगर परिसरातील शेंडे प्लॉटवर ते राहतात. औद्योगिकरणात चंद्रपुरात सिमेंट-काँक्रिटचे जंगल उभे झाले. रस्त्यालगतची कडूनिंबाची झाडे रूंदीकरणात कापली गेली. झाडीपट्टीत मन गुंतलेल्या वसंत घुगरे यांना ही बाब अस्वस्थ करायची. पर्यावरणाचा :हास थांबवून पुन्हा पक्षांचा चिवचिवाट कानी यावा, अवतीभवती झाडे बघायला मिळावी ही त्यांच्या मनातील अस्वस्थता होती. त्यांच्या या अस्वस्थतेला अखेर वाट मिळाली. चरितार्थ चालविण्यासोबतच  त्यांनी पदरमोड करून  घरी रोपांचे संवर्धन सुरू केले. झाडाखाली पडलेला पालापाचोळा जमा करून घरच्या घरी कंपोष्ट खत तयार करणो सुरू केले. लोकांनी रस्त्यावर फेकलेले पाण्याचे पाऊच, पॉलिथीन बॅग, पार्सलमधून अन्न नेल्यावर फेकून दिले जाणारे प्लास्टीकचे छोटे कंटेनर्स, डबे इतरांसाठी टाकाऊ असले तरी ते गोळा करण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यात रोपटी लावणो आणि ती मोठी झाल्यावर विद्यार्थी, नागरिकांना वाटून देणो हा त्यांचा नित्यक्रमच ठरला आहे. अलिकडे त्यांनी घरच्या घरी बोन्साय तयार करून अंगणात बोन्साय आणि रोपटय़ांची बाल्कनीच उभारली आहे. इच्छुकांना बोन्साय तयार करण्याचे ते प्रशिक्षणही देतात. तुळस, कोरफड, शतावरी, गुळवेल, एग्लोमा, पानफुटी, जांभुळ, अश्वगंधा, आवळा, बेल, करंजी, काशिद, बदाम, अशोक, सिताफळ, रामफळ, अमृतफळ, चिंच, फणस, आंबा, कडूनिंब, पानफुटी, गुलमोहर, क्रोटान यासह कितीतरी रोपटी आणि महावृक्षांच्या बोन्सायने त्यांचे अंगण व्यापून उरले आहे. 
स्वातंत्र्यदिनाचा मूहर्त साधून ही रोपटी ते वाटून देतात. रोपटी तयार करणो आणि मोठी झाल्यावर वाटणो हा त्यांचा जणू व्यासंग आहे. वर्षभरात ते किमान एक ते दिड हजारांवर रोपटी वाटतात. दिलेली रोपटी योग्य ठिकाणी लावण्यास आणि त्याची निट काळजी घेण्यासाठी सांगायलाही ते विसरत नाहीत. आपण जे करतो ते खुप मोठे काम आहे, अथवा इतरांहून वेगळे काही करतो याचा बडेजावपणा त्यांच्यात मुळीच नाही. पण निसर्गाच्या प्रेमापोटी सुरू असलेली या बारावी नापास माणसाची धडपड उच्चशिक्षीतांनाही लाजविणारी मात्र नक्कीच आहे.