शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

VIDEO : वृक्षदानातून ते फुलवितात निसर्गाचा ‘वसंत’

By admin | Updated: August 15, 2016 12:23 IST

चंद्रपुरातील एका निसर्गवेडय़ाने निसर्गातूनच घेवून निसर्गासाठीच नागरिकांना दान करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षापासून चालविला आहे.

गोपालकृष्ण मांडवकर
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. १५ -  ‘आपणासी जे जे ठावे, ते इतरांशी सांगावे’ असे संतवचन आहे. या नुसार अनेकजण आपल्या संचयातून इतरांना दान देत असतात. मात्र चंद्रपुरातील एका निसर्गवेडय़ाने निसर्गातूनच घेवून निसर्गासाठीच नागरिकांना दान करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षापासून चालविला आहे. 
वसंत तुकाराम घुगरे असे त्यांचे नाव. नावातच ‘वसंत’ असलेल्या या ध्येयवेडय़ाने वसुंधरेचा वसंत सदैव फुलता पाहण्याचे स्वप्न उरी बाळगले आहे. त्या स्वयंप्रेरणोतून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी नागरिकांना वृक्षदान करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. मूल तालुक्यातील जुनासुर्ला हे त्यांचे गाव. मुळात झाडीपट्टीतील गावात त्यांचे बालपण गेल्याने निसर्गाशी त्यांची जबरदस्त दोस्ती आहे. पुढे पोटापाण्यासाठी ते चंद्रपुरात स्थायिक झाले. येथील रामनगर परिसरातील शेंडे प्लॉटवर ते राहतात. औद्योगिकरणात चंद्रपुरात सिमेंट-काँक्रिटचे जंगल उभे झाले. रस्त्यालगतची कडूनिंबाची झाडे रूंदीकरणात कापली गेली. झाडीपट्टीत मन गुंतलेल्या वसंत घुगरे यांना ही बाब अस्वस्थ करायची. पर्यावरणाचा :हास थांबवून पुन्हा पक्षांचा चिवचिवाट कानी यावा, अवतीभवती झाडे बघायला मिळावी ही त्यांच्या मनातील अस्वस्थता होती. त्यांच्या या अस्वस्थतेला अखेर वाट मिळाली. चरितार्थ चालविण्यासोबतच  त्यांनी पदरमोड करून  घरी रोपांचे संवर्धन सुरू केले. झाडाखाली पडलेला पालापाचोळा जमा करून घरच्या घरी कंपोष्ट खत तयार करणो सुरू केले. लोकांनी रस्त्यावर फेकलेले पाण्याचे पाऊच, पॉलिथीन बॅग, पार्सलमधून अन्न नेल्यावर फेकून दिले जाणारे प्लास्टीकचे छोटे कंटेनर्स, डबे इतरांसाठी टाकाऊ असले तरी ते गोळा करण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यात रोपटी लावणो आणि ती मोठी झाल्यावर विद्यार्थी, नागरिकांना वाटून देणो हा त्यांचा नित्यक्रमच ठरला आहे. अलिकडे त्यांनी घरच्या घरी बोन्साय तयार करून अंगणात बोन्साय आणि रोपटय़ांची बाल्कनीच उभारली आहे. इच्छुकांना बोन्साय तयार करण्याचे ते प्रशिक्षणही देतात. तुळस, कोरफड, शतावरी, गुळवेल, एग्लोमा, पानफुटी, जांभुळ, अश्वगंधा, आवळा, बेल, करंजी, काशिद, बदाम, अशोक, सिताफळ, रामफळ, अमृतफळ, चिंच, फणस, आंबा, कडूनिंब, पानफुटी, गुलमोहर, क्रोटान यासह कितीतरी रोपटी आणि महावृक्षांच्या बोन्सायने त्यांचे अंगण व्यापून उरले आहे. 
स्वातंत्र्यदिनाचा मूहर्त साधून ही रोपटी ते वाटून देतात. रोपटी तयार करणो आणि मोठी झाल्यावर वाटणो हा त्यांचा जणू व्यासंग आहे. वर्षभरात ते किमान एक ते दिड हजारांवर रोपटी वाटतात. दिलेली रोपटी योग्य ठिकाणी लावण्यास आणि त्याची निट काळजी घेण्यासाठी सांगायलाही ते विसरत नाहीत. आपण जे करतो ते खुप मोठे काम आहे, अथवा इतरांहून वेगळे काही करतो याचा बडेजावपणा त्यांच्यात मुळीच नाही. पण निसर्गाच्या प्रेमापोटी सुरू असलेली या बारावी नापास माणसाची धडपड उच्चशिक्षीतांनाही लाजविणारी मात्र नक्कीच आहे.