विदर्भात वाघांची संख्या घटली!

By Admin | Updated: May 28, 2014 23:56 IST2014-05-28T21:49:39+5:302014-05-28T23:56:00+5:30

विदर्भात वाघांची संख्या घटली!

Vidarbha tiger population decreases! | विदर्भात वाघांची संख्या घटली!

विदर्भात वाघांची संख्या घटली!

विदर्भात वाघांची संख्या घटली!
व्याघ्र प्रकल्पांची लपवाछपवी : सीबीआयचा अभ्यासाअंती निष्कर्ष
गणेश वासनिक / अमरावती : विदर्भातील वाघांची आकडेवारी फुगवून सांगण्यात व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी जोरकस प्रयत्न करीत असले तरी वाघांची संख्या घटल्याचे वास्तव पुढे आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने नुकत्याच मेळघाट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढल्याचे सूत्रांनी सांगितले़
मागील दोन वर्षांत विदर्भात पाच ते सात वाघांची हत्या तर दोन ते तीन वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे ठरविले. त्यानुसार सीबीआयच्या त्रिसदस्यीय पथकाने मेळघाट, ताडोबा व पेंच येथील व्याघ्र प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. या चमुने अद्यापपर्यत शासनाला अहवाल सादर केला नाही़; मात्र तीन वर्षांत विदर्भात १० ते १२ वाघांची हत्या झाल्याच्या निष्कर्षाअंती हे पथक पोहचले आहे़ मागील व्याघ्र प्रगणेच्या तुलनेत विदर्भात वाघांची संख्या २५ ते ३० ने घटल्याचे दिसून यंेईल़ वाघांची हत्या आणि नैसर्गिक मृत्युच्या घटनांमुळे व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या रिक्त जागा भरण्यात आल्यात. एवढेच नव्हे तर त्यांना शस्त्रे, वाहने उपलब्ध करून देण्यात आली. शिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने पेंच व ताडोबा येथे व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. मात्र, मेळघाटात व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याच्या दृष्टिने कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. येथे वाघांची संख्या आणि संरक्षणबाबत लपवाछपवी सुरू असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपासून मेळघाटात ५९ वाघ असल्याची आकडेवारी वनविभागाच्या रेकॉर्डवर कायम आहे. मेळघाटात वाघांसाठी पोषक वातावरण असल्याचे सीबीआयच्या पथकाने स्पष्ट केले आहे. मात्र येथे शिकार्‍यांनी पायमुळे घ˜ रोवल्याचा निष्कर्ष देखील त्यांनी काढला आहे. मेळघाटात शिकार्‍यांना पायबंद घालणे, हे वनविभागापुढे मोठे आव्हान आहे. यासंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक दिनेश त्यागी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
------------------------------------
मास्टर माईंडपर्यत पोहचण्यात अपयश
मध्यंतरी ताडोबा, पेंच, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची हत्या झाल्यानंतर नागपूर वनविभागाने काही वनतस्करांना वाघांच्या कातड्यासह ताब्यात घेतले. या तस्करांनी मेळघाटात वाघ मारल्याची कबुली दिली. त्यानंतर या तस्करांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात दिले. पूर्व मेळघाट वनविभागात वाघाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आरोपींच्या माध्यमातून वनविभागाने एक एक कडी उलगडली. मात्र हा तपास पुणे येथे जाऊन थांबला. परिणामी मास्टर माईंडपर्यत वनविभाग पोहचू शकला नाही. वाघांच्या शिकारी करण्यामागे कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
------------------------------------

Web Title: Vidarbha tiger population decreases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.