शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

“आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:08 IST

VBA Prakash Ambedkar Letter To NCP Sharad Pawar: आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केले आहे.

VBA Prakash Ambedkar Letter To NCP Sharad Pawar: ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलनाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. यानंतर आता आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केले आहे.

आरक्षण बचाव यात्रेत सहभाग घ्या

आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरे, गावे आणि गावांमधून ही यात्रा जाणार आहे. इतर मागास जाती (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षण वाचवणे; एससी, एसटी आणि ओबीसींसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण; एससी/एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे; ओबीसी विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्तीचा विस्तार; ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे, या मुद्द्यांवर या यात्रेत भर देण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून ‘बचाव यात्रा’ सुरू होईल आणि त्याच दिवशी महात्मा फुले वाडा, पुणे येथे जाईल. मी तुम्हाला २६ जुलै २०२४ रोजी किंवा यात्रेदरम्यान कोणत्याही वेळी कोल्हापुरात माझ्यासोबत येण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही या यात्रेत सामील व्हाल, अशी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, ही यात्रा मुंबई येथून २५ जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून छगन भुजबळ, शरद पवार यांच्यासह अन्य नेते या यात्रेत सहभाग घेणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSharad Pawarशरद पवारreservationआरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेस