शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 17:05 IST

Prakash Ambedkar News: आपल्या शेजारचे देश भारताला आव्हाने देत आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश भारतापासून अंतर ठेवत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेते भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. तर भाजपा विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता भारताच्या परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मालदीवसोबत वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्याने यांनी आर्थिक मदत बंद केली आहे. मालदीव विरोधात कारवाई केली जात आहे. सरकार यावर काहीच बोलल नाही. मालदीव आपल्या सुरक्षचेच्या दृष्टीने महत्त्वाचे बेट आहे. अफगाणिस्तान आता तालिबान चालवत आहे. बांगलादेश सोबतचे आपले संबंध बिघडत चालले आहेत. बाजूचा केवळ भूतान आपल्यासोबत असून, इतर सगळ्या देशांशी संबंध बिघडले आहेत, हे लक्षात येत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे

जर्मनी, फ्रांस हे देश आपल्यापासून अंतर ठेवत आहेत. हे सरकार २०२४ मध्ये जर निवडून आले तर इतर देश कायदा करतील. इतर देशातील किती लोक आपल्या देशात राहणार, याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या भारताला बसणार आहे. आपले शेजारी देश आपल्याला सोडून गेले आहेत. आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

दरम्यान, निर्मला सीतारामन या मोदींच्या व्हॉईस आहेत तर त्यांचे पती देशाचा व्हॉइस आहेत. मणिपूरमध्ये जे घडलं त्यावर आपले लोक गंभीर विचार करत नाहीत हे दुर्दैव आहे. चीन आपल्या देशात घुसत आहे. राजनाथ सिंह म्हणतात की, पीओकेमधील लोक भारतात यायला तयार आहेत. हे खोटे आहे. देशाच्या सुरक्षेला धोका आहे. नेपाळ आपल्या देशाला आव्हान देत आहे. त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा भाग दाखवला आहे. उत्तराखंड माधला हा सगळा भाग आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४