शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:35 IST

पुण्यातल्या भाजपाच्या शंभर नगरसेवकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे असंही वसंत मोरे यांनी म्हटलं.

पुणे - उद्धवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले. ईडीच्या अटकेपासून १०० दिवस जेलमध्ये असताना आलेले अनुभव राऊतांनी त्यात लिहिले आहेत. हेच पुस्तक पुण्यातील उद्धवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी त्यांच्या देवाऱ्यात ठेवले. त्याचे पूजन केले. कोणत्याही आव्हानात्मक कामाची सुरुवात आपल्या देवाऱ्यापासून करतो. मी या पुस्तकाची ४० पाने वाचली. शिवसैनिक म्हणून आम्ही हे वाचणारच आहोत पण याची वाचण्याची गरज भाजपाच्या लोकांना आहे. खऱ्या अर्थाने मोदी काहीच नव्हते त्यांना पाठिंबा कुणी दिला, विश्वगुरू होण्यामागे पायाभरणी कुणी केली, हे सर्व भाजपाच्या लोकांनी वाचायला हवं असा टोला वसंत मोरे यांनी लगावला. 

वसंत मोरे म्हणाले की, जे याला बालसाहित्य म्हणतायेत, त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. मोदींसोबत राज्यातील नेत्यांनाही प्रेरणा मिळेल. विरोधात बसून ज्याला यशस्वी राजकारण करायचे आहे त्याने हे पुस्तक वाचले पाहिजे असं राऊत म्हणाले होते. राजकारण चांगले आहे परंतु ते करताना आव्हाने येत असतात. त्यामुळे चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ती देवाऱ्यापासून केली पाहिजे म्हणून मी केले. हे प्रेरणादायी पुस्तक आहे. मला पुणे शहरासोबत राज्यात ठिकठिकाणी पुस्तकाची मागणी आलीय त्यामुळे मी राऊतांना पुस्तक देण्याची विनंती केली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पुस्तकात बाजीराव मोदी असा उल्लेख केला आहे. बाजीराव कोण हे पुणेकरांना सांगण्याची गरज नाही. थोरल्या बाजीरावांना अटकेपार झेंडे लावले होते. पुण्यातल्या भाजपाच्या शंभर नगरसेवकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. या पुस्तकातून प्रेरणा मिळते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पत्राचाळीत ६९२ आसपास घरे आहेत. जे प्रकरण झाले त्यात म्हाडा आणि बिल्डर यांच्यातील वाद आहे. प्रवीण राऊत हे विकासकाचे नाव असेल तर राऊत राऊत जोडण्याचे कारण नाही असंही वसंत मोरे यांनी म्हटलं.

दरम्यान, नरेंद्र मोदींना हटवू नका असं बाळासाहेब ठाकरेंनी लालकृष्ण अडवाणींना सांगितले होते. २०१३ साली मोदींचा चेहरा भाजपाने पुढे आणला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला. त्यांना एक पत्र दिले आणि भाजपा कार्यालयात देण्यास सांगितले. पीयूष गोयल गर्दीतून संजय राऊतांना घेऊन आतमध्ये गेले. कार्यालयात राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी बसले होते. राऊतांना पाहताच नरेंद्र मोदींनी "आ गयी शिवसेना..." हा महत्त्वाचा शब्द आहे. आता शिवसेना आली, अभी मुझे डर नही..शिवसेना पूर्ण ताकदीने भाजपासोबत आहेत असं पत्र दिले. त्यामुळे जे नरेंद्र मोदींना विश्वगुरू म्हणतात. त्यांच्या पंतप्रधानपदाचा पाया रचला गेला तो शिवसेनेने रचला असंही पुस्तकात उल्लेख केल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Vasant Moreवसंत मोरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा