शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 14:05 IST

काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते...

ठळक मुद्देवरिष्ठ सूत्रांची माहिती : काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही लवकरच निर्णयाची शक्यता  वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरूजलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

धनाजी कांबळे - पुणे : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाख मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हीच वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत लहान जातींमधील समूहांना प्रतिनिधित्व देणार असून, सुमारे २५ मुस्लिमांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मात्र, हे मतदारसंघ कोणते असतील याबाबत मात्र गुप्तता राखण्यात येत आहे. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र,  लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्धीला देऊन एमआयएमची वंचित सोबतची आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून मात्र तसा कोणताही संदेश किंवा पत्र ‘वंचित’च्या वर्किंग कमिटीकडे किंवा वंचितचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरू केली होती. त्यामुळे युती कायम ठेवायची, किंवा तोडायची याचा निर्णयदेखील तेच घेतील. त्यामुळे त्यांचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अजूनही एमआयएम आमच्यासोबतच आहे, असे पत्र वंचितच्या वर्किंग कमिटीने प्रसिद्धीस दिले आहे. जलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असताना वंचितच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत मुस्लिम, ओबीसी, धनगर, गरीब मराठा, आदिवासी अशा लहान समाज घटकांना स्थान देण्यात आले आहे. त्याची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असून, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने जातीच्या उल्लेखासह उमेदवार जाहीर केले होते. तोच फॉर्म्युला यावेळी देखील कायम ठेवण्यात आला असून, आतापर्यंत ज्यांना कोणत्याच राजकीय पक्षाने संधी दिली नाही, अशा वंचित घटकांना निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रतिनिधित्व देण्यावर भर असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत युती करण्याच्या चर्चा होत असताना एमआयएम असेल, तर आघाडी होणे शक्य नाही, असे म्हटले जात होते. मात्र, आता जलील यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार एमआयएम बाहेर पडली असेल, तर काँग्रेस आघाडी पुन्हा वंचितसोबत चर्चा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आघाडीत सामील होते का नाही, याबद्दलही उत्सुकता आहे. .......जलील यांचा बोलवता धनी कोण?

लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना भरघोस मते मिळाली, यात वंचितचादेखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. मात्र, खासदार म्हणून निवडून आल्यापासून जलील यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, त्यामुळेच ते एकतर्फी निर्णय जाहीर करीत आहेत, अशी चर्चा आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना विचारून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे, का स्वत:च निर्णय घेतला आहे, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे जलील यांचा बोलावता धनी कोण? एमआयएम वंचितपासून वेगळी होण्याने कुणाचा फायदा होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे......... 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर