शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 14:05 IST

काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते...

ठळक मुद्देवरिष्ठ सूत्रांची माहिती : काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही लवकरच निर्णयाची शक्यता  वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरूजलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

धनाजी कांबळे - पुणे : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाख मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हीच वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत लहान जातींमधील समूहांना प्रतिनिधित्व देणार असून, सुमारे २५ मुस्लिमांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मात्र, हे मतदारसंघ कोणते असतील याबाबत मात्र गुप्तता राखण्यात येत आहे. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र,  लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्धीला देऊन एमआयएमची वंचित सोबतची आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून मात्र तसा कोणताही संदेश किंवा पत्र ‘वंचित’च्या वर्किंग कमिटीकडे किंवा वंचितचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरू केली होती. त्यामुळे युती कायम ठेवायची, किंवा तोडायची याचा निर्णयदेखील तेच घेतील. त्यामुळे त्यांचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अजूनही एमआयएम आमच्यासोबतच आहे, असे पत्र वंचितच्या वर्किंग कमिटीने प्रसिद्धीस दिले आहे. जलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असताना वंचितच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत मुस्लिम, ओबीसी, धनगर, गरीब मराठा, आदिवासी अशा लहान समाज घटकांना स्थान देण्यात आले आहे. त्याची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असून, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने जातीच्या उल्लेखासह उमेदवार जाहीर केले होते. तोच फॉर्म्युला यावेळी देखील कायम ठेवण्यात आला असून, आतापर्यंत ज्यांना कोणत्याच राजकीय पक्षाने संधी दिली नाही, अशा वंचित घटकांना निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रतिनिधित्व देण्यावर भर असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत युती करण्याच्या चर्चा होत असताना एमआयएम असेल, तर आघाडी होणे शक्य नाही, असे म्हटले जात होते. मात्र, आता जलील यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार एमआयएम बाहेर पडली असेल, तर काँग्रेस आघाडी पुन्हा वंचितसोबत चर्चा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आघाडीत सामील होते का नाही, याबद्दलही उत्सुकता आहे. .......जलील यांचा बोलवता धनी कोण?

लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना भरघोस मते मिळाली, यात वंचितचादेखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. मात्र, खासदार म्हणून निवडून आल्यापासून जलील यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, त्यामुळेच ते एकतर्फी निर्णय जाहीर करीत आहेत, अशी चर्चा आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना विचारून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे, का स्वत:च निर्णय घेतला आहे, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे जलील यांचा बोलावता धनी कोण? एमआयएम वंचितपासून वेगळी होण्याने कुणाचा फायदा होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे......... 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर