शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
2
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
3
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
4
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
5
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
6
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
7
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
8
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
9
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
10
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
11
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
12
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
13
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
14
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
15
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
16
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
17
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
20
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स

शेती अन् मातीसाठी लढणाऱ्या वैशाली येडेंना मतदारांनी डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 17:01 IST

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला.

मुंबई - परिवहन महामंडळाच्या बसमधून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या वैशाली येडे यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागला. लोकशाही मार्गाने शेती आणि मातीसाठी लढा देण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली यांना मतदारांनी डावलले. देशात ५० टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. तर एक महिला खासदार बॉम्बस्फोट कटातील आरोप आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ही लोक लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी वैशाली येडे यांना मतदार डावलतात. याला लोकशाहीचे अपयश म्हणाव का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील मोठ्या हिंमतीने मतदार संघात प्रचार केला. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वैशाली यांचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली होती. नवऱ्याच्या निधनानंतर वैशाली देखील त्यांचा मार्ग निवडू शकत होत्या. मात्र वैशाली यांनी लढण्याचा निर्णय घेतला. हार न मानता वैशाली यांनी दोन मुलांचे संगोपन केले.

शेतकरीच शेतकऱ्यांची अडचण समजू शकतो, या मुद्दावर त्या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्या. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्याकडे केवळ ५०० रुपये होते. निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचे मुख्य आव्हान होते. मी लोकांना पैसा आणि मत दोन्ही देण्याचे आवाहन केले, असं वैशाली सांगतात. पुरेसा पैसा नसल्यामुळे वैशाली यांनी महामंडळाच्या बसमधून प्रचार केला. शेतकरी प्रतिनिधी संसदेत पाठविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे वैशाली यांनी म्हटले. परंतु, त्यांना यश आले नाही.

शेतकरी आत्महत्या, गरीबी आणि शेती क्षेत्रातील सुधारणांवर वैशाली यांनी निवडणूक लढवली. मात्र मतदार संघातील मतदारांनी या मुद्द्यांना फारसं प्राधान्य दिले नाही. मतदारांनी शेती आणि मातीसाठी लढा देणाऱ्या वैशाली येडे यांना नाकारले.

संधी मिळाल्यास पुन्हा लढणार

वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीत २० हजार मते मिळाली. शेतकऱ्यांनी मला विजयी केले नाही. पण तरी देखील मी २० हजार मतदारांचा विश्वास संपादन करू शकले. त्यामुळे मी हार मानली नाही. संधी मिळाल्यास आपण पुन्हा निवडणूक लढवू, अस वैशाली येडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bachhu Kaduबच्चू कडूShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम