शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पाणी ‘मोजून’ वापरा! जादा वापरल्यास व्यावसायिक दर, मात्र कोटाही वाढवून देणार  

By यदू जोशी | Updated: September 16, 2017 05:16 IST

राज्यात सर्वत्र मुबलक पाऊस झाला, धरणसाठे भरले म्हणून भरमसाट पाणी वापरणार असाल तर वेळीच सावध व्हा... कारण, दरमाणशी मर्यादेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यास तुम्हाला व्यावसायिक दराने पाणीपट्टी भरावीे लागू शकते.

मुंबई : राज्यात सर्वत्र मुबलक पाऊस झाला, धरणसाठे भरले म्हणून भरमसाट पाणी वापरणार असाल तर वेळीच सावध व्हा... कारण, दरमाणशी मर्यादेपेक्षा अधिक पाण्याचा वापर केल्यास तुम्हाला व्यावसायिक दराने पाणीपट्टी भरावीे लागू शकते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण याबाबतची अधिसूचना लवकरच काढणार आहे.पाण्याचा भरमसाट वापर थांबविण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सध्या असलेली पाणी वापराची दरमाणशी मर्यादा वाढवून दिली जाणार असली तरी, त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास व्यावसायिक दर लावण्यात येणार आहे.मुंबई महापालिकेमार्फत सध्या दरमाणशी १३५ लीटर इतके पाणी पुरविले जाते. ते १६५ लीटर इतके करण्यात येणार आहे. मात्र १७५ पेक्षा अधिकच्या वापरासाठी व्यावसायिक दराने पाणीपट्टी ग्राहकांकडून आकारली जाणार आहे. अन्य महापालिकांमध्ये पाण्याचा दरमाणशी १३५ लीटर इतका कोटा असतो. तो आता दरमाणशी १५० लीटर इतका करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये सध्याच्या दरमाणशी ४० लीटरऐवजी ५५ लीटर पाणी पुरविले जाईल. नगरपालिकांमधील कोटा मात्र माणशी ७० ते १२५ लीटर इतकाच कायम ठेवण्यात येणार आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमधील पाणी ग्राहकांनी त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा १० टक्के जादा पाणी वापरले तर सामान्य पाणीपट्टी आकारली जाईल. त्यापेक्षा अधिकच्या पाण्यासाठी व्यावसायिक दराने पाणीपट्टी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारली जाईल.ठरवून दिलेल्या पाणीकोट्याची मर्यादा ओलांडणाºया ग्राहकांकडून व्यावसायिक दर आकारणी करण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्याचे अधिकार जलसंपत्ती प्राधिकरणाकडे आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. श्रीमंतांच्या सोसायट्या, बंगल्यांमध्ये हजारो लीटर पाणी वापरले जाते, पण त्यासाठी त्यांना जादा दर सध्या द्यावा लागत नाही.महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या देशात अग्रेसर राज्य आहे. पण एकूण वापरातील पाण्यापैकी अधिकृत केवळ तीन टक्केच पाणी उद्योग वापरतात. प्रचंड पाणीवापर करणारे उद्योग हे अवैधरीत्या पाणी घेऊन पाणीपट्टी चुकवतात, याची आकडेवारीच जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे आली आहे. हा अवैध पाणीवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत. याशिवाय, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामांपासून विविध कारणांसाठी करणाºया टँकर लॉबीला चाप बसविण्यासाठी नवीन नियमही करण्यात येणार आहेत, असे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.मिनरल वॉटरच्या नावाखालची पाणीचोरी रोखणारराज्यात आज अनेक गावे अशी आहेत की तेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पण मिनरल वॉटरचे कारखाने बिनबोभाट सुरू आहेत. त्यांच्याकडील पाणीवाटपाचे कोणतेही आॅडिट केले जात नाही. मिनरल वॉटरच्या नावाखाली गावातील पाणीसाठ्यातून अवैधरीत्या/ चोरून आणलेले पाणी जुजबी तुरटी वगैरे टाकून बॉटलबंद केले जाते आणि ते विकले जाते. या पार्श्वभूमीवर, आता पाण्याच्या बॉटलवर त्यातील पाण्याचा स्रोत काय ते नमूद करावे लागणार आहे. शिवाय, पाणी शुद्ध करण्यासाठीच्या प्रक्रियेचा उल्लेखही करणे अनिवार्य असेल.

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबई