शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:40 IST

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे  (एनईपी) केवळ पदवीधारक विद्यार्थी तयार होणार नाहीत तर उत्तुंग व्यक्तिमत्त्व तयार होतील. आणि ते जे काही करतील ते देशासाठी व जगासाठी चांगलेच करतील. आपले शिक्षण धोरण केवळ दस्ताऐवज नाही तर विद्यार्थी आणि नागरिकांची आकांक्षा यातून प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पवई येथील ए.एम. नाईक या शाळेची स्थापना लार्सन ॲण्ड टूब्रोचे समूह अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ए. एम. नाईक यांनी केली आहे. अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार प्रतिबिंबित होतात. भारतीय परंपरेत ज्ञान आणि शिक्षा बहुआयामी होते. आता लागू करण्यात आलेले नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना पूरक असून, याद्वारे विद्यार्थ्यांची प्रतिभा आणखी बहरेल. भविष्यही आणखी उज्ज्वल होईल. 

शाळेचे संस्थापक ए. एम. नाईक म्हणाले की, शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी करण्यात आली आहे.

पालक जेव्हा आपल्या मुलांना शिक्षकांकडे पाठवतात तेव्हा ते शिक्षकांना ईश्वरासमान मानतात. ते मूल ईश्वराची देणगी असते, देशाचे भविष्य असते आणि येणारे युग घडवणारी व्यक्ती असते. या दृष्टिकोनातून त्या मुलाकडे पाहिले तर शिक्षणाचा अर्थ आपोआप स्पष्ट होतो. त्या मुलांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असू शकतात; पण शिक्षण देत असताना शिक्षकाने त्याच्यामधील सर्व अवगुण काढून टाकून त्या मुलांमध्ये चाणाक्षपणा, उद्यमशीलता, परिश्रम आणि परोपकार हे गुण विकसित केले पाहिजेत. - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहStudentविद्यार्थीSchoolशाळा