शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:40 IST

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे  (एनईपी) केवळ पदवीधारक विद्यार्थी तयार होणार नाहीत तर उत्तुंग व्यक्तिमत्त्व तयार होतील. आणि ते जे काही करतील ते देशासाठी व जगासाठी चांगलेच करतील. आपले शिक्षण धोरण केवळ दस्ताऐवज नाही तर विद्यार्थी आणि नागरिकांची आकांक्षा यातून प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पवई येथील ए.एम. नाईक या शाळेची स्थापना लार्सन ॲण्ड टूब्रोचे समूह अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ए. एम. नाईक यांनी केली आहे. अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार प्रतिबिंबित होतात. भारतीय परंपरेत ज्ञान आणि शिक्षा बहुआयामी होते. आता लागू करण्यात आलेले नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना पूरक असून, याद्वारे विद्यार्थ्यांची प्रतिभा आणखी बहरेल. भविष्यही आणखी उज्ज्वल होईल. 

शाळेचे संस्थापक ए. एम. नाईक म्हणाले की, शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी करण्यात आली आहे.

पालक जेव्हा आपल्या मुलांना शिक्षकांकडे पाठवतात तेव्हा ते शिक्षकांना ईश्वरासमान मानतात. ते मूल ईश्वराची देणगी असते, देशाचे भविष्य असते आणि येणारे युग घडवणारी व्यक्ती असते. या दृष्टिकोनातून त्या मुलाकडे पाहिले तर शिक्षणाचा अर्थ आपोआप स्पष्ट होतो. त्या मुलांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असू शकतात; पण शिक्षण देत असताना शिक्षकाने त्याच्यामधील सर्व अवगुण काढून टाकून त्या मुलांमध्ये चाणाक्षपणा, उद्यमशीलता, परिश्रम आणि परोपकार हे गुण विकसित केले पाहिजेत. - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहStudentविद्यार्थीSchoolशाळा