शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:40 IST

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे  (एनईपी) केवळ पदवीधारक विद्यार्थी तयार होणार नाहीत तर उत्तुंग व्यक्तिमत्त्व तयार होतील. आणि ते जे काही करतील ते देशासाठी व जगासाठी चांगलेच करतील. आपले शिक्षण धोरण केवळ दस्ताऐवज नाही तर विद्यार्थी आणि नागरिकांची आकांक्षा यातून प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पवई येथील ए.एम. नाईक या शाळेची स्थापना लार्सन ॲण्ड टूब्रोचे समूह अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ए. एम. नाईक यांनी केली आहे. अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार प्रतिबिंबित होतात. भारतीय परंपरेत ज्ञान आणि शिक्षा बहुआयामी होते. आता लागू करण्यात आलेले नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना पूरक असून, याद्वारे विद्यार्थ्यांची प्रतिभा आणखी बहरेल. भविष्यही आणखी उज्ज्वल होईल. 

शाळेचे संस्थापक ए. एम. नाईक म्हणाले की, शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी करण्यात आली आहे.

पालक जेव्हा आपल्या मुलांना शिक्षकांकडे पाठवतात तेव्हा ते शिक्षकांना ईश्वरासमान मानतात. ते मूल ईश्वराची देणगी असते, देशाचे भविष्य असते आणि येणारे युग घडवणारी व्यक्ती असते. या दृष्टिकोनातून त्या मुलाकडे पाहिले तर शिक्षणाचा अर्थ आपोआप स्पष्ट होतो. त्या मुलांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असू शकतात; पण शिक्षण देत असताना शिक्षकाने त्याच्यामधील सर्व अवगुण काढून टाकून त्या मुलांमध्ये चाणाक्षपणा, उद्यमशीलता, परिश्रम आणि परोपकार हे गुण विकसित केले पाहिजेत. - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहStudentविद्यार्थीSchoolशाळा