शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी, संघाची भूमिका; आजपासून अ.भा.प्रतिनिधी सभेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 7:52 PM

त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेलिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात  महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत

नागपूर : त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेलिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात  महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत, अशी भुमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मांडण्यात आली आहे. शुक्रवारपासून नागपूर येथील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान माहिती देताना संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी यासंदर्भात वक्तव्य केले.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ९ ते ११ मार्च या कालावधीत चालणार आहे. या सभेत संघ परिवारातील विविध संघटनांतील सुमारे १५०० पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यात विभाग प्रचार, संघाच्या ६ कार्यविभागातील पदाधिकारी, प्रांत संघचालक, कार्यवाह, प्रांत प्रचारक, अखिल भारतीय पदाधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. याचप्रमाणे विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडतील. संघाची पुढील ३ वर्षांत कार्याची दिशा नेमकी काय असेल यावर यात चर्चा होणार आहे. सोबतच संघकार्य विस्तारासंदर्भातील मुद्द्यांवरदेखील या सभेत मंथन होईल, असे डॉ.वैद्य यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते. 

१० तारखेला सरकार्यवाहपदाची निवडणूक-

या प्रतिनिधी सभेत संघातील दुस-या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानण्यात येणाºया सरकार्यवाहपदाची निवड होणार आहे. वर्तमान सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डॉ.कृष्णगोपाल, भागय्या व सुरेश सोनी यांच्यापैकी एकाला संधी मिळते याकडे संघवर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘नवनियुक्त’ सरकार्यवाहांची निवड १० मार्च रोजी होणार आहे.

अमित शहा होणार सहभागी-

अ.भा.प्रतिनिधी सभेत भाजपचे पदाधिकारीदेखील उपस्थित असतात.मागील वेळप्रमाणे यंदादेखील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संघटनमंत्री रामलाल, राम माधव हे सहभागी होतील. अमित शहा नेमके कधी येतील, ते आम्हाला माहिती नाही, असे डॉ.वैद्य यांनी स्पष्ट केले.

तरुणांना संघात जोडण्यावर भर-

गेल्या काही काळापासून संघाशी मोठ्या प्रमाणात लोक जुळत आहेत. विशेषत: ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमातून जुळणाºया २० ते ३५ या वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. मेरठ येथे नुकताच राष्ट्रोदय नावाचा कार्यक्रम झाला. १९९८ साली अशाच कार्यक्रमाला २० हजार स्वयंसेवक आले होते. यंदा ही संख्या १ लाख ४५ हजारांवर पोहोचली. याशिवाय महाराष्ट्रातील कोकण प्रांत, देवगिरी प्रांत, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या कार्यक्रमांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक सहभागी झाले होते. संघात बाल स्वयंसेवक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी नियोजनावर सभेत चर्चा होईल. तसेच संघ विस्तार व बळकटीवरणावरदेखील सखोल मंथन होईल, असे डॉ.वैद्य यांनी सांगितले.

सामाजिक समरसतेकडे आणखी एक पाऊल-

२०१५ साली झालेल्या अ.भा.प्रतिनिधी सभेत संघाने सामाजिक समरसतेसंदर्भातील प्रस्ताव संमत केला होता. संघाचे सामाजिक समरसतेवर कार्य सुरू असून समाजामध्ये सामाजिक सद्भाव बैठका वाढविण्याचा प्रयत्न आहे. याला बळकटी देण्यात येईल. या बैठकांमुळे जातीगत विद्वेष दूर होईल, असा विश्वास डॉ.मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :statue Vandalismपुतळ्यांची विटंबनाnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ