शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बीटीच्या ३५ लाख पाकिटांची विनापरवाना विक्री, तणनाशक तंत्रज्ञानाचा अवैध वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 19:01 IST

राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत..

अमरावती : राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत. तणनाशक तंत्रज्ञानाचा विनापरवानगीने वापर करण्यात आल्यानेच शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करून शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाला घरचा आहेर दिला आहे. मोन्सँटो कंपनीचे तणनाशक निरोधक (राऊंडअप बी.टी.) तंत्रज्ञानाचा विनापरवानगी वापर करून देशभरात  ४७२ कोटी रुपयांच्या ३५ लाख पाकिटांची विक्री झाली व या बियाण्याचा वापर करून सुमारे साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली, असे अतिशय धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यामुळे  तणनाशक निरोधक बी.टी. बियाणे आलेच कसे, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली. 

केंद्राची जेनेटिक इंजिनीअरिंग अपरायजल कमिटी , भारत सरकारची कृषी संशोधन परिषद व कापूस संशोधन संस्थेची तसेच कृषी विद्यापीठाची अवैध बियाणे रोखण्याची जबाबदारी आहे. अशा बियाण्यांना परवानगी देण्यासाठी कायदे, नियम आहेत. केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद, कृषी परिषदेसह विविध संस्थांचे अशा बियाण्यांवर नियंत्रण असते. त्यांच्या मान्यतेविना असे बियाणे देशात येतच नाहीत. अशा स्थितीत हे बियाणे आलेच कसे, असा  सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण देशात हा गोरखधंदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या हातमिळवणीमुळेच चालत  असावा, असा आरोपही  तिवारी यांनी केला.सरकारी यंत्रणांचे हितसंबधच कारणीभूतगेल्या दोन-तीन वर्षांपासून तणनाशक निरोधक राऊंडउप बी.टी.  बियाण्यांचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम शेतकºयांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात कॅन्सर, किडनीचे आजार बळावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे.  तंत्रज्ञान लीक होत नाही. सरकारच्या विविध संस्थांचे बियाणे, खत व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांशी हितसंबंध यात गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी