शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील शहीद होणाऱ्या जवानांसाठी सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 07:31 IST

कश्मीरच्या सीमेवर पाकडय़ांच्या हल्ल्यात रोजच आमचे जवान बलिदान देत आहेत. त्यामुळेही देशाला क्लेश होत आहेत. तेव्हा या क्लेशाचा निषेध म्हणून सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार आहे?

मुंबई- काश्मीरच्या सीमेवर पाकड्यांच्या हल्ल्यात रोजच जवान बलिदान देत आहेत. त्यामुळेही देशाला क्लेश होत आहेत. तेव्हा या क्लेशाचा निषेध म्हणून सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार आहे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून विचारला आहे. काँग्रेस व भाजपाच्या उपोषणानंतर सामना संपादकीयमधून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसच्या फसलेल्या उपोषणास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने त्यांचा उपोषण उत्सव साजरा केला, पण तिथेही अनेक भाजप कार्यकर्त्यांनी खाऊन–पिऊन उपोषण केल्याचे उघड झाले, या उपोषणाने नक्की काय साध्य झाले हे कोणी सांगू शकणार नाही, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानात पंतप्रधान मोदींनी हाती झाडू घेतला म्हणून अनेकांनी ‘स्वच्छ’ असलेले रस्ते झाडण्यासाठी हाती झाडू घेतला, पण देश खरेच स्वच्छ झाला काय? उपोषण व आत्मक्लेशाचेही तसेच आहे.

भारतीय जनता पक्ष हा मनाने अत्यंत हळवा व संवेदनशील वगैरे असल्याने त्या मंडळींनी एक दिवसाचे उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वाया गेल्याचा निषेध म्हणून भाजपने हे देशभर उपोषण केल्याचे सांगितले आहे. संसदेचे अधिवेशन गुंडाळून आठ दिवस होत आले. त्यामुळे ज्या दिवशी अधिवेशन गुंडाळले त्या दिवशीच संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर पंतप्रधानांसह सगळ्यांनीच या उपोषणाचा बार उडवायला हवा होता, पण आठ दिवसांनी उपोषण व संसदेतील वाया गेलेल्या कालखंडाचा विचार सुचला. उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराविरोधात राहुल गांधी व त्यांच्या काँग्रेसने एक दिवसाचे ‘खाऊन-पिऊन’ उपोषण केले. दिल्लीतील बडे काँग्रेस नेते उपोषणाआधी हॉटेलात जाऊन ‘छोले भटुरे’वर कसा यथेच्छ ताव मारीत आहेत त्याची खमंग छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. स्वतः राहुल गांधी उपोषणस्थळी उशिरा पोहोचले. आदल्या दिवशीचे ‘डिनर’ त्यांनी बहुधा पहाटे केले व त्यामुळे उठायला उशीर झाला असावा. इतर काँग्रेसवाल्यांनीही उपोषणाचा कार्यक्रम गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे देशभरातून त्यांच्या उपोषणाचे हसे झाले. भाजपने तर सोशल मीडियावर खिल्ली उडवली. काँग्रेसच्या फसलेल्या उपोषणास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने त्यांचा उपोषण उत्सव साजरा केला, पण तिथेही अनेक भाजप कार्यकर्त्यांनी खाऊन–पिऊन उपोषण केल्याचे उघड झाले. या उपोषणाने नक्की काय साध्य झाले हे कोणी सांगू शकणार नाही. या देशातील बहुसंख्य जनता आजही उपाशीच असते.

कुपोषणाने मुलांचे बळी जातच आहेत. भूक व उपासमारीस कंटाळून कुटुंबेच्या कुटुंबे आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारच्या काळातच तीन हजारांवर लोकांनी आत्मक्लेश म्हणून आत्महत्या केल्या व देशात चार लाखांवर शेतकऱ्यांनी हा ‘आत्मक्लेश’ करून घेतला. सरकारच्या फसलेल्या नोटाबंदीने लाखो लोकांचा रोजगार बुडाला. त्या क्लेशामुळेही अनेकांनी जीवनयात्रा संपवली. कश्मीरच्या सीमेवर पाकडय़ांच्या हल्ल्यात रोजच आमचे जवान बलिदान देत आहेत. त्यामुळेही देशाला क्लेश होत आहेत. तेव्हा या क्लेशाचा निषेध म्हणून सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार आहे? महात्मा गांधी हे उपोषण करीत व काँग्रेस पक्षाला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी झुकवीत. आचार्य विनोबा भावे उपोषण करीत असत. सीमा प्रश्न सुटावा म्हणून सेनापती बापट उपोषणास बसले, पण इंदिरा गांधी यांनी आश्वासन देऊनही सीमा प्रश्न सोडवला नाही. अण्णा हजारे यांनीही नुकतेच दिल्लीत उपोषण केले. त्या उपोषणानेही नक्की काय हाती लागले?

काँग्रेस राजवटीत अण्णा हजारे उपोषणास बसले तेव्हा अण्णांचा ‘जय जय’ करण्यात भाजप आघाडीवर होता, पण आज अण्णा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषणास बसले तेव्हा भाजप सरकारने अण्णांपासून पळ काढला. म्हणजे काँग्रेस काळातले अण्णांचे उपोषण ज्यांनी डोक्यावर घेतले त्यांनीच कालचे अण्णांचे उपोषण अपयशी ठरेल याची व्यवस्था केली. उपोषण हे राजकीय हत्यार झाले आहे असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. २०१४ साली जी वचने दिली त्यातील कशाचीच पूर्तता झालेली नाही. त्या फसवणुकीचा आत्मक्लेश आजही देशाची जनता करून घेत आहे. संसद अधिवेशनाचा कालखंड हा तसा वायाच जात आहे. काँग्रेस राजवटीतही संसदेचा मोठा कार्यकाल वायाच गेला. बोफोर्सपासून टूजी घोटाळ्यापर्यंतच्या वादांवरून तेव्हाच्या विरोधकांनी गदारोळ केला आणि संसदेचे कामकाज होऊ दिले नव्हते. पुन्हा असे करणे म्हणजे जनतेच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून देणे, असे तेव्हा सांगितले गेले. मग नोटाबंदीपासून कोकणात लादलेल्या विषारी नाणार प्रकल्पापर्यंत शिवसेना आवाज उठवत आहे. हा जनतेचा आवाज नाही काय? फक्त आम्ही उपोषणाचे ढोंग केले नाही इतकेच. स्वच्छ भारत अभियानात पंतप्रधान मोदींनी हाती झाडू घेतला म्हणून अनेकांनी ‘स्वच्छ’ असलेले रस्ते झाडण्यासाठी हाती झाडू घेतला, पण देश खरेच स्वच्छ झाला काय? उपोषण व आत्मक्लेशाचेही तसेच आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस