शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

"उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’, भाजपाचा बोचरा वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:01 IST

Uddhav Thackeray: मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता. त्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर घडलेल्या घडामोडी, सत्तांतर यादरम्यानची राज्यपालांची भूमिका, शिंदे गटाकडून करण्यात येणारे दावे, यावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं असतं, अशीही टिप्पणी केली. त्यावर मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नैतिकतेला जागून राजीनामा दिला असं म्हणतात, मात्र ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती, असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेल्या दाव्यांबाबत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आता उद्धव ठाकरे एकीकडे न्याय मेला नाही आहे, असं म्हणतात. तर दुसरीकडे महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे असंही म्हणताहेत. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? उद्धव ठाकरे आपण नैतिकतेला जागून राजीनामा दिला म्हणतात. ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती.तुम्ही राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वोच्च ठेऊन मुख्यमंत्री झालात. किमान सरकार तर धीटपणे चालवायचं होतं. विचारधारा सोडली, पक्षातले साथीदार सोडून गेले, तरी नाही समजलं एवढा अहंकार मोठा कसा झाला ?, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने कोणालाही फोडून कोणाच्याही दावणीला बांधलं नाही आहे. दावणीला बांधणं काय असतं, हे अडीच वर्षात मविआ काळात सगळ्या जनतेनं बघितलं आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेसाठी विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाणं, म्हणजे दावणीला बांधणं असतं. वेळ गेली असली, तरी अजूनही विचार करा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष