शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

"उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’, भाजपाचा बोचरा वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:01 IST

Uddhav Thackeray: मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता. त्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर घडलेल्या घडामोडी, सत्तांतर यादरम्यानची राज्यपालांची भूमिका, शिंदे गटाकडून करण्यात येणारे दावे, यावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं असतं, अशीही टिप्पणी केली. त्यावर मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नैतिकतेला जागून राजीनामा दिला असं म्हणतात, मात्र ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती, असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेल्या दाव्यांबाबत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आता उद्धव ठाकरे एकीकडे न्याय मेला नाही आहे, असं म्हणतात. तर दुसरीकडे महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे असंही म्हणताहेत. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? उद्धव ठाकरे आपण नैतिकतेला जागून राजीनामा दिला म्हणतात. ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती.तुम्ही राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वोच्च ठेऊन मुख्यमंत्री झालात. किमान सरकार तर धीटपणे चालवायचं होतं. विचारधारा सोडली, पक्षातले साथीदार सोडून गेले, तरी नाही समजलं एवढा अहंकार मोठा कसा झाला ?, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने कोणालाही फोडून कोणाच्याही दावणीला बांधलं नाही आहे. दावणीला बांधणं काय असतं, हे अडीच वर्षात मविआ काळात सगळ्या जनतेनं बघितलं आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेसाठी विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाणं, म्हणजे दावणीला बांधणं असतं. वेळ गेली असली, तरी अजूनही विचार करा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष