शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

उन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 10:39 IST

सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपाला टार्गेट केले आहे.

मुंबई, दि. 23 - मीरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपाला एकहाती वर्चस्व मिळवता आले. 95 पैकी तब्बल 61 जागा जिंकून भाजपाने मिळवलेला विजय हा आतापर्यंत मीरा- भार्इंदर महापालिकेत एका पक्षाने मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. दरम्यान, जैन धर्माचे मुनी नयपद्मसागर महाराज यांनीही जाहीरपणे भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत शिवसेनेला केलेला विरोधही भाजपाच्या फायद्याचा ठरला. यावरुनच सामना संपादकीयमधून भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आले आहे.   

मीरा-भाईंदरच्या निवडणूक प्रचारात जैन धर्मीयांचे ‘मुनी’ उतरले व त्यांनी ज्या भाषेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. ती भाषा व कृती एखाद्या जैन मुनीस शोभणारी नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  शिवाय, निवडणुकीत एखाद्या धर्मगुरूनेच जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर आधी कायद्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  दरम्यान, पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निकालादरम्यानही शिवसेनेच्या हाती भोपळा लागला, अशी टीका करण्यात आली होती. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी  प्रत्युत्तर दिले आहे. 

''आम्ही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा पाळत नसलो तरी भोपळ्याची भाजी ही ‘श्राद्ध’ वगैरे समयी विशेष करून पितरांसाठी केली जाते. त्यामुळे शिवसेनेच्या हाती लागलेला भोपळा हा संकेत समजावा. हा भोपळाच उतणाऱ्या-मातणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही.'', असे उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये म्हटले आहे.   

काय आहे सामना संपादकीय?पनवेलनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकांचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. पनवेलात शिवसेनेच्या हाती भोपळा लागला असे बोलणाऱ्यांना आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, बाबांनो उतू नका, मातू नका. अर्थात या ऊतमात करणाऱ्यांच्या हाती कोणताही वसा नसल्याने घेतला वसा सोडू नका असे बजावण्यातही अर्थ नाही. पनवेलचे रेतीसम्राट अब्जोपती ठेकेदार दत्तक घेतले नसते तर तुमच्या हाती ‘लिंबू’ही लागले नसते व सुकलेली लिंबे चोळत बसण्याची वेळ तुमच्यावर आली असती. दुसरे असे की, भोपळ्याची आठवण करून दिलीच आहे म्हणून सांगायचे. आम्ही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा पाळत नसलो तरी भोपळ्याची भाजी ही ‘श्राद्ध’ वगैरे समयी विशेष करून पितरांसाठी केली जाते. त्यामुळे शिवसेनेच्या हाती लागलेला भोपळा हा संकेत समजावा. हा भोपळाच उतणाऱ्या-मातणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. राहता राहिला विषय मीरा-भाईंदर निवडणुकांचा. येथे कमळाबाईंवर मतांची दौलतजादा झाली व ‘६१-६२’ जागा जिंकून भाजप बहुमताने सत्ताधीश झाला. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे २२ जागा जिंकून मागे पडली तरी त्याची खंत वाटण्याचे कारण नाही. मीरा-भाईंदरचे निकाल हे धक्कादायक वगैरे नाहीत. येथे सरळ जातीयवादी प्रचार झाला. धर्मगुरू हा कोणत्याही धर्माचा असो. संयम आणि शांततेचा संदेश हीच त्याची भूमिका असायला हवी, पण मीरा-भाईंदरच्या निवडणूक प्रचारात जैन धर्मीयांचे ‘मुनी’ उतरले व त्यांनी ज्या भाषेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. ती भाषा व कृती एखाद्या जैन मुनीस शोभणारी नाही. मोह, माया, मत्सरापासून लांब राहण्याचे सोडून सरळ चौकाचौकात प्रचार सभा घेणे हे कोणते राजकारण? या निवडणुकीत एखाद्या धर्मगुरूनेच जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर आधी कायद्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जामा मशिदीच्या इमामाप्रमाणे इतर धर्मगुरू वागू लागले तर हा देश अस्थिर व अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मीरा-भाईंदरमधील ‘मराठी’ टक्का हा शिवसेनेबरोबर राहिला, पण मुंबईप्रमाणेच इतर जात-प्रांतवाले महाराष्ट्रात राहून जातीय प्रचारात ओंडक्याप्रमाणे वाहून गेले. त्यामुळे पनवेलातील भोपळा आता जातीय उन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आमचा धृतराष्ट्र झालेला नाही!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा