शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

'...तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 15:50 IST

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा स्वपक्षीय मंत्र्यांना घरचा आहेर

अहमदनगर: राज्यातलं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार किती काळ चालेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास सत्तेतल्या तिन्ही पक्षांना आहे. तर हे सरकार पाडण्याची गरज नसून ते आपोआप कोसळेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी नीट वागली नाहीत, तर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असं मत गडाख यांनी अहमदनगरमध्ये व्यक्त केलं. बंगले, खातेवाटपावरुन नाराज होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनादेखील त्यांनी घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुरबुरी सुरुच राहिल्यास उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील. कारण तो राजकारणी माणूस नाही. मी त्यांना जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी त्यांना ओळखतो. तो कलावंत माणूस आहे. शब्द पाळणारा माणूस आहे, असं यशवंतराव गडाख म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक मंत्री रोज रुसतो. कधी या पक्षात कुरबुरी सुरू असतात, तर कधी त्या पक्षात नाराजीनाट्य घडत असतं. बंगला नीट मिळाला नाही, खातं नीट मिळालं नाही, यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरू असते. हे कुठेतरी थांबायला हवं, असं गडाख म्हणाले. उद्धव ठाकरेंचं कौतुक करणाऱ्या गडाख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना वर्तणूक सुधारण्याचा सल्ला दिला. 'उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला नसता, तर काँग्रेस पक्ष विरोधी बाकांवरच राहिला असता. त्यांना केवळ तोंडाची हवा सोडत राहावं लागलं असतं. पण उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यानं तुम्ही मंत्री झालात. तरीही तुमचं हाच बंगला पाहिजे. तेच खातं पाहिजे, अशा कुरबुरी सुरू आहेत. आता तरी सुधारा', अशा शब्दांत गडाख यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपण आपल्या भावना व्यक्त केल्याचंदेखील गडाख यांनी सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाणपणानं वागायला हवं, असं गडाख म्हणाले. 'उद्धव ठाकरे शब्द पाळणारा माणूस आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ द्यायचं असेल, तर दोन्ही काँग्रेसनं भांडणं कमी करायला हवीत. जरा शहाणपणानं वागायला हवं. म्हणजे हे सरकार चालेल,' असं गडाख यांनी म्हटलं. 'राज्यात आता ग्रामीण भागातलं सरकार आलेलं आहे. ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायला तुम्हाला कशाला बंगले पाहिजे? कशाला कार्यालयं पाहिजेत? राहता कशाला मुंबईतल्या बंगल्यांमध्ये?', असे प्रश्न गडाख यांनी उपस्थित केले. मंत्र्यांनी लोकांमध्ये राहायचं असतं, हे कुणीतरी त्यांना सांगण्याची गरज आहे. ग्रामीण भागातलं सरकार असल्यानं ते चालावं अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी आणि बहुजनांची इच्छा असल्याचंदेखील ते म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेYashwantrao Gadakयशवंतराव गडाखBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस