शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 11:56 AM

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची भूमिका ; विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती

ठळक मुद्देजिल्हा आता दुष्काळी नाही, बरेच क्षेत्र सिंचनाखाली - तानाजी सावंत समांतर पाईपलाईन झाली तरच उजनीचे नियोजन शक्य  - तानाजी सावंत महाराष्ट्रातील १३५ जागा कोणत्या हे आम्ही सांगणे उचित होणार नाही - तानाजी सावंत

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल माझे अभिनंदन करायला आले होते. त्यांनी अभिनंदन केले याचा अर्थ ते शिवसेनेत आले किंवा आम्ही त्यांना आमंत्रित केले. किंवा ते फारच आतुर आहेत, असा होत नाही. त्यांच्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील, असे स्पष्टीकरण जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले. 

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण कशा पध्दतीने लढायचे याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील. त्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील. 

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला किती जागा मागायच्या हे ठरलेले नाही. पण जे काही करायचे आहे ते पक्ष प्रमुखांकडे करु. ते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही जागा मागू. सध्या भाजपला १३५ आणि शिवसेनेला १३५ जागा देणे निश्चित झाले आहे. मित्रपक्षांना १८ जागा मिळतील. 

बार्शीची जागा सेनेकडे राहणार का?, असे विचारले असता सावंत म्हणाले, आज कोणत्याही एका जागेबद्दल बोलता येणार नाही. महाराष्ट्रातील १३५ जागा कोणत्या हे आम्ही सांगणे उचित होणार नाही. ते पक्ष प्रमुख सांगतील. आदेश आले की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगण्यापूर्वी माध्यमांना सांगू. जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदा माझ्या माध्यमातून मंत्रीपद मिळाले. माढा विधानसभेबाबत आताच काही सांगणार नाही. पण आम्ही जिंकण्याच्या ताकदीने लढणार आहोत. कुणाला कौल द्यायचा हे शेवटी मतदार ठरविणार आहेत.

जिल्हा आता दुष्काळी नाही, बरेच क्षेत्र सिंचनाखाली- सोलापूर जिल्हा आता दुष्काळी जिल्हा राहिला नाही, असे मतही तानाजी सावंत यांनी व्यक्त केले. बरेच क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जिल्ह्यातील अनेक उताºयावर केवळ जिरायती असे दिसणार नाही. उजनीच्या पाण्याच्या नियोजन काटेकोरपणे गरजेचे आहे. या पध्दतीने काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. हे पाणी १२ महिने पुरले पाहिजे. आदेश अधिकाºयांना दिले आहेत. 

समांतर पाईपलाईन झाली तरच उजनीचे नियोजन शक्य - जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उजनीच्या नियोजनावर भाष्य केले. सोलापूर शहराला अर्धा टीएमसी पाणी लागते. पण त्यासाठी चार टीएमसी पाणी सोडावे लागते. वर्षभरात जवळपास १५ टीएमसी पाणी जादा लागते. त्यातून उजनीच्या पाण्याचे नियोजन बिघडते. जोपर्यंत उजनी ते सोलापूर ही नवी पाईप लाईन होत नाही तोपर्यंत पाणी असेच वाया जाणार. उजनीच्या मूळ आराखड्यानुसार पाण्याचे नियोजन होणार नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Sopalदिलीप सोपल