शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

Sanjay Raut : पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:50 IST

Sanjay Raut : आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

मुंबई : अडीच वर्षापूर्वी राज्यात समान किमान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि शिवनेसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, असे साकडे घातल्याचे सांगितले. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचे देखील हेच म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे हेच पुढील पंचवीस वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे हा कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे."

राज्यसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे. त्यांना या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे, असं दिसत आहे खरं तर त्यांच्याकडे एवढी मते नाही आहेत, जर मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केले असते. पण भाजपाने आधी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्‍यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

याचबरोबर, आश्चर्य वाटतं भाजपाचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. जे भाजपाचे निष्ठावान आहेत, जे संघ परिवाराशी संबंधित आहेत, वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचे मी वाचले. जे इतर पक्षातून आले आहेत आणि शिवसेना, महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातच नाराजी आहे, असे माझ्या वाचण्यात, पाहण्यात आलेले आहे. हा भाजपा जुना पक्ष राहिलेला नाही. अशाच बाहेरच्या  लोकांनी एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेतला आहे. शिवसेनेत निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे संजय राऊत म्हणाले. याशिवाय, आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. यावेळी येथील लोकांसोबत संवाद साधला. तसेच, या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार' असे साकडे घातल्याचे सांगितले. याचबरोबर, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना "मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळे महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसे ठरवणार," असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupriya Suleसुप्रिया सुळेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा