शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Sanjay Raut : पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:50 IST

Sanjay Raut : आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

मुंबई : अडीच वर्षापूर्वी राज्यात समान किमान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि शिवनेसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, असे साकडे घातल्याचे सांगितले. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचे देखील हेच म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे हेच पुढील पंचवीस वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे हा कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे."

राज्यसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे. त्यांना या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे, असं दिसत आहे खरं तर त्यांच्याकडे एवढी मते नाही आहेत, जर मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केले असते. पण भाजपाने आधी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्‍यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

याचबरोबर, आश्चर्य वाटतं भाजपाचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. जे भाजपाचे निष्ठावान आहेत, जे संघ परिवाराशी संबंधित आहेत, वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचे मी वाचले. जे इतर पक्षातून आले आहेत आणि शिवसेना, महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातच नाराजी आहे, असे माझ्या वाचण्यात, पाहण्यात आलेले आहे. हा भाजपा जुना पक्ष राहिलेला नाही. अशाच बाहेरच्या  लोकांनी एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेतला आहे. शिवसेनेत निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे संजय राऊत म्हणाले. याशिवाय, आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. यावेळी येथील लोकांसोबत संवाद साधला. तसेच, या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार' असे साकडे घातल्याचे सांगितले. याचबरोबर, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना "मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळे महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसे ठरवणार," असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupriya Suleसुप्रिया सुळेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा