शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार; काय म्हणाले संजय राऊत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:58 IST

मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकातून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोनदा जाणे हे पचनी पडणारे नव्हते असं शरद पवारांनी पुस्तकात लिहिलं आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांवर आणि शंकावर सडेतोड उत्तर देतील. सामनातून त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात. लोकांच्या भूमिका नसतात. या विषयावर माझे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर सामनातून प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होतेय. तुम्हाला या सर्व प्रश्नांची किंवा शंका उत्पन्न झालेत त्यावर सडेतोड उत्तरे मिळतील असं त्यांनी सांगितले आहे. 

तसेच एका अनेक वर्ष राजकीय प्रवास, संघर्ष केलेल्या नेत्याची ती आत्मकथा आहे. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर जे लोक असतील ते उत्तर देतील. प्रत्येकाची वेगळी बाजू आणि भूमिका असते. ती बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. शरद पवारांबाबत ज्या भूमिका आहेत ती उद्धव ठाकरे मुलाखतीतून मांडणार आहेत. त्यात सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. भाकरी फिरवण्याची वेळ आलीय हे त्यांनी विधान केले. पण त्यांनी तवाच फिरवला असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

मंत्रालयात न जाण्यावरून पवार ठाकरेंवर नाराजउद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावर शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात भाष्य केले आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात न जाण्यावर पवारांची नाराजी होती, हे या पुस्तकातून समोर आले आहे. याबाबत पवारांनी लिहिले आहे की, उद्भवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते. बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्भवशी बोलताना नव्हती. राज्याच्या प्रमुखाला उद्या काय होऊ शकेल त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य हवे. याची कमतरता जाणवत होती. हे टाळता आले असते असं शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत