शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही राज्याची इच्छा - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 22:07 IST

'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटायला जाणार आहे'

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या बैठकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत लक्ष ठेवून आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले आहे की, तीन पक्षांचे सरकार येणार आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी करावी लागेल. यासंदर्भातील दिल्लीत घडामोडी घडत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

याचबरोबर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटायला जाण्याची शक्यता नाकारता येणार आहे. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडले. कोणत्या विषयावर चर्चा झाली. याबाबची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना द्यावी लागेल. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे.  याशिवाय, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदी कोण असेल, याची माहिती सोनिया गांधींना देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे ही राज्याची इच्छा आहे. पण, हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान,  राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक झाली. ही चर्चा आज आणि उद्याही सुरु राहील, महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल. गेल्या काही दिवसातील अस्थिरता संपुष्टात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार स्थापन  होऊ  शकत नाही. आम्ही लवकरच स्थिर आणि पर्यायी सरकार देऊ, सरकारबाबत चर्चा सकारात्मक सुरु आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधी