शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं, पण...; प्रकाश आंबेडकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 10:36 IST

मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला असून फडणवीसांवरही आरोप केले आहेत.

सोलापूर - महाराष्ट्र जळतोय, जे सत्तेत येण्यासाठी लढत आहेत, त्यांनी ज्या प्रश्नावर महाराष्ट्र जळतोय त्यावर भूमिका घ्यायची नाही. त्याची कारणं काय हे मी लोकांसमोर मांडलं आहे. त्यांनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं पण मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी बोलावं असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

आरक्षण बचाव यात्रा ही सोलापूरमध्ये पोहचली त्याठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी आम्ही आरक्षणावर जनजागृती करत आहोत. शरद पवार यांनी आरक्षणावर जे विधान केले ती राजकीय पळवाट आहे. पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आला तर तुम्हाला याला तोंड द्यावं लागणार आहे. तुम्हाला उद्या तोंड द्यायचे असेल तर जरांगे यांच्या मागणीच्या तुम्ही बाजूने आहात की विरोधात आहात हे तुम्हाला स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. या पळवाटा म्हणजे हे सगळेजण ओबीसींच्या विरोधातले आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केली.

तसेच राजकीय भूमिका घेतली तर त्या भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो. आम्ही भूमिका घेतली त्यावर मराठा आणि ओबीसीही नाराज नाही. ही व्यवहार्य भूमिका आहे. मी जरांगे, हाके सगळ्यांनाच भेटायला गेलो होतो. कुणाला भेटल्याने भूमिका बदलत नाही. गरीब मराठा आणि ओबीसी यांचं २ ताट हवेत, ही संकल्पना वंचितची आहे. ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवता येऊ नये ही आमची मागणी आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर वेगळे दिले पाहिजे. त्याचा वेगळा विचार होऊ शकतो असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

जरांगे-फडणवीस भांडण नकली

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांचे नकली भांडण आहे. ते फसवण्याचं भांडण आहे कारण जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टार्गेट केले आहे. टार्गेट करून ओबींसींना असं वाटतंय जरांगेविरोधात कोण तर ते देवेंद्र फडणवीस, मग आपले फडणवीस असं सुरू झालंय. देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत ती भाजपा यावर भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे जरांगे-फडणवीस यांचं भांडण ठरवून झालेले आहे. ओबीसींना फसवण्यासाठी हे भांडण आहे असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस