शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:12 IST

Uddhav Thackeray Interview: पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण? यावर उद्धव ठाकरेंनी सूचक भाष्य केले.

Uddhav Thackeray Interview: पंतप्रधान मोदी आता पंचाहत्तर वर्षांचे होत आहे. मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींवर पंचाहत्तरीची शाल घातलेली आहे. त्यामुळे आता बोले तैसा चाले आहे की, वाकडी यांची पाऊले आहेत, हे कळेलच. या सगळ्यांचे प्रमुख मोहन भागवत आहेत आणि तेही आता पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत. पंतप्रधान मोदी कदाचित निवृत्ती जाहीर करतील. मोदींनंतर कोण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. या प्रश्नावर त्यांनी उत्तर शोधले असेल किंवा शोधायला सुरुवात केली असेल. त्यांच्याकडे उत्तर असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. 

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण, याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न संजय राऊतांनी केला. यावर बोलताना, आपल्याकडे जी लोकशाही आहे. त्यानुसार ज्याचा पक्ष जिंकतो किंवा बहुमत ज्या पक्षाकडे असते, त्या पक्षाचा नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो. एकदा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये. तो देशाचा किंवा राज्याचा प्रमुख झाला पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.  

आपण कुठेतरी हा पायंडा तोडला पाहिजे

आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे. एकदा नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाला की, तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो. हे घडले आहे. तुम्ही देशाचे पालक आहात. तुम्ही राज्याचे पालक आहात. तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर मी सर्वांशी समानतेने वागेन, ही शपथ आहे. मीही मुख्यमंत्री म्हणून अशी शपथ घेतली आणि मला वाटते की, तसे वागण्याचा प्रयत्न केला. तसे वागलो की नाही हे तुम्हीच सांगा. पक्षाचा प्रचार करायचा असेल, तर आताच्या प्रथेप्रमाणे मीही केला असेन. परंतु, आपण कुठेतरी हा पायंडा तोडला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते. दत्ताजी नलावडे हेदेखील पक्षाच्या कार्यक्रमाला येऊन भाषण करत नव्हते. पक्षाकडून काही प्रशिक्षण शिबीर ठेवले, तर ते त्यासाठी यायचे. परंतु, मनोहर जोशी पक्षाच्या जाहीर सभांना लोकसभेचा अध्यक्ष झाल्यावर येत नव्हते. हे पथ्य कुणीतरी सुरू केले पाहिजे. आता सगळे एकतर्फी चाललेले आहे. अद्यापही अपात्रतेचे विषय कशा पद्धतीने हाताळले जात आहेत, ते बघा. शेड्युल १० आहे, त्याची कशी वाताहात लावलेली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवतPoliticsराजकारण