शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कुजबुज: उद्धव ठाकरेंची रणनीती! वर्चस्व अन् ताकद असणाऱ्या नेत्यांची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:58 IST

महायुतीमधीलच काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्याची चर्चा आहे

वैष्णव यांच्याकडे हे मागणे

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचा खर्चाचा भार रेल्वे मंत्रालयाने उचलल्यामुळे मोठा दिलासा लाभला, हे उत्तम झाले.  रेल्वे मार्गावरील मृत्यू कमी करण्याबाबत खा. शिंदे व वैष्णव यांच्यात काही चर्चा झाली किंवा कसे, अशी कुजबुज प्रवाशांमध्ये आहे. पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या वाढवा, लोकल फेऱ्यांची संख्या वाढवा, शटल सर्व्हिसच्या पर्यायाचा विचार करा, अशा प्रवाशांच्या मनातील मागण्यांबाबत खा. शिंदे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तर प्रवाशांचे जीव वाचतील. भिवंडीचे खा. सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांच्याप्रमाणे खा. शिंदे यांनी प्रवाशांसोबत चर्चा केली तर पुढील बैठकीत तरी वैष्णव यांच्याकडे ते पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा आहे.

मनात आहे तरी काय?

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर महायुतीतील शिंदेसेनेने हक्क सांगितला आहे. पक्षाचे नवी मुंबईतील दाेन्ही प्रमुख नेते जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटा यांनी पत्रकार परिषद घेऊन दाेन्ही जागांवर दावा केल्याने  भाजपचे विद्यमान आमदार गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांचे काय? कारण दोन्ही विद्यमान जागा भाजपच्या ताब्यात आहेत.  विधानसभेच्या जागावाटपाची अद्याप महायुतीत बोलणी झालेली नाहीत. याबाबत चर्चाही नाहीत. असे असताना शिंदेसेनेने थेट पत्रकार परिषदेतच या जागांवर दावा केल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. 

गडकरी दखल घेणार का?

पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी जिल्ह्यातील प्रश्नांसाठी, विशेषतः मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या निकृष्ट कामाची तक्रार करण्यासाठी केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या महामार्गाचे काम करणारा ठेकेदार गुजरातमधील असून तो स्थानिक प्रशासनाला जुमानत नाही, अशी स्थानिकांची भावना आहे.  मात्र, ठेकेदार सर्वांच्याच तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावतो. खासदार सवरा यांनी याबाबत लोकांच्या तक्रारी केंद्रीय स्तरावर पोहोचवल्या आहेत. आता गुजराती ठेकेदाराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काळ्या यादीत टाकतील का, या प्रश्नाभोवती जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

ठाकरेंकडून चाचपणी

लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मविआ आणि महायुतीचे उमेदवार कोण? या चर्चा सर्वत्र होत असताना उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. महायुतीचा आढावा घेता निवडून आलेले काही जण पुन्हा  निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, तशा हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. पण महायुतीमधीलच काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्याची चर्चा आहे. त्यांची ताकद पाहता अशांची चाचपणी उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून सुरू असल्याची कुजबुज आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGanesh Naikगणेश नाईकShrikant Shindeश्रीकांत शिंदे