शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Uddhav Thackeray Speech: ... म्हणून मी शिवसैनिकांना थांबवले; संभाव्य रक्तपातावर उद्धव ठाकरे बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:53 IST

कोश्यारी पत्र लिहीत होते, प्रार्थनास्थळे उघडा, आम्ही तेव्हा हॉस्पिटल उघडत होतो. कोरोना काळात दिल्लीतूनही दबाव येत होता, हे करा ते करा, मी नाही केले. कडूपणा घेतला कारण जनतेला वाचवायचे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाढत चाललेला तणाव यावर उद्धव ठाकरेंनी आज भाष्य केले. गोरेगावमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी ठाकरे यांनी मी शिवसैनिकांना शांत रहा असे सांगितले नसते तर रक्तपात झाला असता, असा इशारा दिला आहे. 

सध्या राज्यात बाप पळवणारी टोळी फिरतीय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांचे कौतुक केले. 'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. हे काही नवीन नाहीये, आम्ही शिवरायांचा इतिहास वाचलाय. त्यावेळेसही आदिल शहा, निझाम शहा, हा शहा, तो शहा चालून आले. आताही अमित शहा येऊन गेले. देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही, इथल्या जमिनीत गवताची पाती नाहीत, तलवारीची पाती आहेत. तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दात त्यांनी शहांवर टीका केली.

कोरोना काळात दिल्लीतूनही दबाव येत होता, हे करा ते करा, मी नाही केले. कडूपणा घेतला कारण जनतेला वाचवायचे होते. कोश्यारी पत्र लिहीत होते, प्रार्थनास्थळे उघडा, आम्ही तेव्हा हॉस्पिटल उघडत होतो. शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झालीय. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली. गायीच्या आतड्याला चावलेल्या गोचिड दूध नाही तर रक्त पिते, तशाच या गोचिड होत्या. फुटल्या असत्या तरी पित बसल्या असत्या, अशी टीका ठाकरे यांनी केली. 

याचबरोबर ठाकरे यांनी मी शिवसैनिकांना शांत राहण्यास सांगितले नसते तर गद्दारांसोबत रक्तपात झाला असता. गद्दारच रक्त ते. हा रक्तपात झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील. ते होऊ द्यायचे नाहीय म्हणून मी शिवसैनिकांना शांत राहण्यास सांगितलेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. प्रत्येक शाखा उघडी असायला हवी. त्या शाखेत गटप्रमुखही असायला हवेत. अमित शहांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा. शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय, दरवाजा उघडा जायचे असेल तर आताच जा. जे मनाने नाहीत, त्यांना माझ्यासोबत कसे ठेवू. असे म्हणत गेट आऊट असे म्हटले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाहBJPभाजपा