शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 15:16 IST

टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली

मुंबई - वेदांतानंतर राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी युती सरकारला कोंडीत पकडले आहे. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर देत टाटांचा एयरबस प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

याबाबत भाजपा महाराष्ट्रने म्हटलंय की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष स्वत:ला घरात कोंडून घेतल्यानेच एयरबस प्रकल्प गुजरातला गेला. भारताने १२६ C-295 Medium Combat Aircraft साठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एयरबसची निवड करण्यात आली. मोदींनी २०१५ साली एयरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एयरबसने ठेवला. २०१७ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली.

त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणतीही प्रस्ताव व या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद सरकार दरबारी कुठेही आढळून आलेली नाही. फेब्रुवारी २०२२ ला पुन्हा एकदा प्रकल्पाचा पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एयरबसच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद नाही असं भाजपानं म्हटलं आहे. 

त्याचसोबत सप्टेंबर २०२२ मध्ये एयरबसच्या प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे. एयरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? असा सवाल भाजपाने उपस्थित केला. 

दरम्यान, कोणताही उद्योग राज्यात स्वतः हून येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ४ महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असतो. हे मविआच्या 'त्या' दोन - तीन पत्रकारांना कळू नये? असा टोला भाजपानं लगावला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाRatan Tataरतन टाटा