शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी; टाटांच्या एयरबस प्रकल्पावरून भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 15:16 IST

टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली

मुंबई - वेदांतानंतर राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी युती सरकारला कोंडीत पकडले आहे. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर देत टाटांचा एयरबस प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

याबाबत भाजपा महाराष्ट्रने म्हटलंय की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष स्वत:ला घरात कोंडून घेतल्यानेच एयरबस प्रकल्प गुजरातला गेला. भारताने १२६ C-295 Medium Combat Aircraft साठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एयरबसची निवड करण्यात आली. मोदींनी २०१५ साली एयरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एयरबसने ठेवला. २०१७ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली.

त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणतीही प्रस्ताव व या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद सरकार दरबारी कुठेही आढळून आलेली नाही. फेब्रुवारी २०२२ ला पुन्हा एकदा प्रकल्पाचा पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एयरबसच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद नाही असं भाजपानं म्हटलं आहे. 

त्याचसोबत सप्टेंबर २०२२ मध्ये एयरबसच्या प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे. एयरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? असा सवाल भाजपाने उपस्थित केला. 

दरम्यान, कोणताही उद्योग राज्यात स्वतः हून येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ४ महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असतो. हे मविआच्या 'त्या' दोन - तीन पत्रकारांना कळू नये? असा टोला भाजपानं लगावला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाRatan Tataरतन टाटा