शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

निष्ठा सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:47 IST

लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती.

रत्नागिरी - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कोकणात धुव्वा उडाला. कोकणातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. रत्नागिरी, राजापूर या मतदारसंघातही ठाकरेंचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून आला. लोकसभेत याठिकाणी विनायक राऊत यांचा नारायण राणेंनी पराभव केला त्यानंतर विधानसभेतही पक्षाला फटका बसला. त्यामुळे विनायक राऊतांनी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यात पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. त्यातच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी थेट दर्गा गाठला. 

कोकणात शपथ घेण्याला फार महत्त्व असते, एखाद्या प्रसिद्ध मंदिरात, जागृत देवस्थान किंवा ग्रामदेवतेकडे जाऊन शपथ घेतली जाते. यात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पीर बाबर शेख दर्गा गाठून तिथे पक्षातील निष्ठेची शपथ घेतली त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. आपण चुकीचं काम केले नाही. पक्षाचा विश्वासघात केला नाही असा या कार्यकर्त्यांचा दावा होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा देवासमोर शपथ घेण्याचं ठरले त्यात ठाकरेंचे कार्यकर्ते पीर बाबर शेख दर्ग्यात गेले आणि त्यांनी तिथे निष्ठेची शपथ घेतली. मात्र यावेळी जिल्हाप्रमुख आणि सहजिल्हाप्रमुख गैरहजर असल्याचं समोर आले.

नेमकं काय झालं?

लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यात काही पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी नेत्यांसमोरच पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. पक्षातील संघटन मजबूत राहावे आणि विरोधी काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं बैठकीत ठरले. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हातिस येथे जाऊन शपथ घेऊया असं म्हटलं. त्यानंतर तालुका कार्यकारणीतील बहुतांश पदाधिकारी हातिस येथे पोहचून पीर बाबर शेख दर्ग्यात जात शपथ घेतली. 

दरम्यान, उबाठाचा खोटा हिंदुत्ववादी बुरखा फाटला आहे. रत्नागिरीत उबाठाच्या कार्यकर्त्यांना निष्ठेची शपथ घ्यायला जागृत मंदिर दिसले नाही का? असा सवाल करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा