शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:02 IST

महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने सुनावणी झाली. न्यायालयातील सुनावणीकडे आमचं बारीक लक्ष आहे. कोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आणि फुटीर गटाचे आमदार, नेते हे वारंवार निकाल आमच्याच बाजूने लागेल. चिन्ह आम्हाला मिळेल हा आत्मविश्वास येतो कुठून? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई व्हायला हवी. चिन्ह फुटीर गटाला मिळेल हे खात्रीने कसे सांगू शकतात? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आमच्या वकिलांनी कोर्टात ठामपणे आणि मजबुतीने बाजू मांडली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. या देशात संविधान, कायदा, संसदीय लोकशाही यांचा मुडदा कुणी पाडू शकले नाही. रामशास्त्री बाणाचे अनेक जण न्यायव्यवस्थेत आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं सत्य आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार भूमिका मांडली आहे. शिवसेना खरी कुठे आहे ते निवडणुकीला सामोरे जावू. मग जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची? आमची तयारी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक युक्तिवाद कोर्टात मांडले गेले. गुवाहाटीत बसून तुम्ही नोटीस पाठवता असे अनेक मुद्दे समोर आले आहेत. आमची शिवसेना खरी सांगायचं, विधिमंडळ पक्ष सांगायचा. रेड्यांच्या पाठीवर बसून यमासारखं निर्णय घ्यायचे हे अनेक मुद्दे कोर्टात आले आहे. आमच्या मागण्या रेकॉर्डवर आहे. निर्णय स्पष्ट आणि पारदर्शक यावा. महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा. सत्यमेव जयते प्रमाणे सत्याचा, आमचा विजय होईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, शिवजयंती उत्सव वार्डावार्डात गल्लीबोळात शिवसेना साजरी करते. भाजपाला आता शिवाजी महाराज आठवतात. निवडणूक आल्यानंतर त्यांना शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांनी बेईमाना कोथळा काढला होता, बोटे छाटली होती हे त्यांनी विसरू नये. शिवनेरीवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जन्म झाला. त्याच शिवनेरीची माती घेऊन अयोध्येत उद्धव ठाकरे गेले होते. महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करणाऱ्यांना अमित शाह आणि भाजपा कसे पाठिशी घालतायेत हे आकाशातून शिवाजी महाराज पाहत असतील. हा महाराष्ट्र बेईमानांचे बोटे छाटणारा आहे असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय