शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:02 IST

महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने सुनावणी झाली. न्यायालयातील सुनावणीकडे आमचं बारीक लक्ष आहे. कोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आणि फुटीर गटाचे आमदार, नेते हे वारंवार निकाल आमच्याच बाजूने लागेल. चिन्ह आम्हाला मिळेल हा आत्मविश्वास येतो कुठून? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई व्हायला हवी. चिन्ह फुटीर गटाला मिळेल हे खात्रीने कसे सांगू शकतात? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आमच्या वकिलांनी कोर्टात ठामपणे आणि मजबुतीने बाजू मांडली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. या देशात संविधान, कायदा, संसदीय लोकशाही यांचा मुडदा कुणी पाडू शकले नाही. रामशास्त्री बाणाचे अनेक जण न्यायव्यवस्थेत आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं सत्य आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार भूमिका मांडली आहे. शिवसेना खरी कुठे आहे ते निवडणुकीला सामोरे जावू. मग जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची? आमची तयारी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक युक्तिवाद कोर्टात मांडले गेले. गुवाहाटीत बसून तुम्ही नोटीस पाठवता असे अनेक मुद्दे समोर आले आहेत. आमची शिवसेना खरी सांगायचं, विधिमंडळ पक्ष सांगायचा. रेड्यांच्या पाठीवर बसून यमासारखं निर्णय घ्यायचे हे अनेक मुद्दे कोर्टात आले आहे. आमच्या मागण्या रेकॉर्डवर आहे. निर्णय स्पष्ट आणि पारदर्शक यावा. महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा. सत्यमेव जयते प्रमाणे सत्याचा, आमचा विजय होईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, शिवजयंती उत्सव वार्डावार्डात गल्लीबोळात शिवसेना साजरी करते. भाजपाला आता शिवाजी महाराज आठवतात. निवडणूक आल्यानंतर त्यांना शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांनी बेईमाना कोथळा काढला होता, बोटे छाटली होती हे त्यांनी विसरू नये. शिवनेरीवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जन्म झाला. त्याच शिवनेरीची माती घेऊन अयोध्येत उद्धव ठाकरे गेले होते. महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करणाऱ्यांना अमित शाह आणि भाजपा कसे पाठिशी घालतायेत हे आकाशातून शिवाजी महाराज पाहत असतील. हा महाराष्ट्र बेईमानांचे बोटे छाटणारा आहे असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय