शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

Uddhav Thackeray: 'अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठित वार केला', उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:27 IST

Uddhav Thackeray: 'काल जे सरकार स्थापन झालं, तेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. शब्द पाळला असता तर कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.'

मुंबई: काल(दि.30 जून) शिवसेनेचे बंडकोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी परत एकदा अडीच वर्षांपूर्वीच्या अमित शहांच्या शब्दाची आठवण करुन दिली.

'हेच मी मागितलं होतं'

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''सर्वप्रथम मी नवीन सरकारचे अभिनंदन करतो. सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, हीच त्यांच्याकडे अपेक्षा. माझ्यासमोर काही प्रश्न पडले. ज्यापद्धतीने हे सरकार स्थापन झालं, त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केलां. हेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्षे झालीच आहेत, कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.''

'तेव्हा पाठीत वार केला...'

''तेव्हा नकार देऊन आता भाजपने असं का केलं? शिवसेना तुमच्यासोबत होतीच ना. लोकसभा आणि विधानसभेतही तुमच्यासोबत होती. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मला कशाला मुख्यमंत्री बनवायला लावलं. अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, माझ्या पाठीत वार केला. हे म्हणत आहेत की, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. पण, तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेलाच नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून मुख्यमंत्री होऊ शकत नाही.''

'अमित शहांनी शब्द मोडला'

''तेव्हा अमित शहांनी दिलेला शब्त पाळला असता, तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यंत्री झाला असता. आता पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्हीही तेव्हा माझ्या स्वाक्षरीचा करार करुन तो मंत्रालयात लावला असता. म्हणजे, तो सगळ्यांना दिसला असता. पण, त्यांनी शब्द पाळला नाही, पाठित खंजीर खुपसले,'' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकशाही धोक्यात  ''लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे?'' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाह