शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:06 IST

Uddhav Thackeray : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून ३७ कंपन्या परराज्यात गेल्यानंतर आता ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

Hinjewadi IT Park  Componies : राज्यातील उद्योग परराज्यात जाण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत असतात. राज्यात बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असताना उद्योगधंदे शेजारच्या राज्यात जात असल्याने ठाकरे गटाकडून सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका केली जातेय. अशातच पुण्यातील हिंजेवाडीमधून आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्या असल्याची माहिती समोर येताच ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुण्यातील हिंजवडीमधील आयटी पार्कमध्ये जवळपास इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांच्यासारख्या जवळपास १५० कंपन्या आहेत.या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांमध्ये रोज लाखो कर्मचारी कामासाठी येत असतात. त्यामुळे सहाजिकपणे इथल्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागते. त्यामुळे कामावार वेळेत पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. कामावरुन घरी जाताना देखील अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्यामुळे आयटी कंपन्यांनी आता हिंजवडीमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयावरुन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.  वाहतुकीच्या समस्यांमुळे आयटी कंपन्यांचे रोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन ठाकरे गटाने सत्ताधारी महायुती सरकावर टीका केली आहे. आधीचे बरेच उद्योग राज्याबाहेर गेल्याने आता आयटी कंपन्या परराज्यात जात असल्याने ठाकरे गटाने सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

"घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, याआधी देखील वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले होते. या प्रक्लपांवरुन देखील मोठ्या प्रमाणात राजकारण झालं होतं.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानUddhav Thackerayउद्धव ठाकरे