शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:06 IST

Uddhav Thackeray : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून ३७ कंपन्या परराज्यात गेल्यानंतर आता ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

Hinjewadi IT Park  Componies : राज्यातील उद्योग परराज्यात जाण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत असतात. राज्यात बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असताना उद्योगधंदे शेजारच्या राज्यात जात असल्याने ठाकरे गटाकडून सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका केली जातेय. अशातच पुण्यातील हिंजेवाडीमधून आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्या असल्याची माहिती समोर येताच ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुण्यातील हिंजवडीमधील आयटी पार्कमध्ये जवळपास इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांच्यासारख्या जवळपास १५० कंपन्या आहेत.या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांमध्ये रोज लाखो कर्मचारी कामासाठी येत असतात. त्यामुळे सहाजिकपणे इथल्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागते. त्यामुळे कामावार वेळेत पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. कामावरुन घरी जाताना देखील अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्यामुळे आयटी कंपन्यांनी आता हिंजवडीमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयावरुन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.  वाहतुकीच्या समस्यांमुळे आयटी कंपन्यांचे रोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन ठाकरे गटाने सत्ताधारी महायुती सरकावर टीका केली आहे. आधीचे बरेच उद्योग राज्याबाहेर गेल्याने आता आयटी कंपन्या परराज्यात जात असल्याने ठाकरे गटाने सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

"घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, याआधी देखील वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले होते. या प्रक्लपांवरुन देखील मोठ्या प्रमाणात राजकारण झालं होतं.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानUddhav Thackerayउद्धव ठाकरे