शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:06 IST

Uddhav Thackeray : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून ३७ कंपन्या परराज्यात गेल्यानंतर आता ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

Hinjewadi IT Park  Componies : राज्यातील उद्योग परराज्यात जाण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत असतात. राज्यात बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असताना उद्योगधंदे शेजारच्या राज्यात जात असल्याने ठाकरे गटाकडून सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका केली जातेय. अशातच पुण्यातील हिंजेवाडीमधून आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्या असल्याची माहिती समोर येताच ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुण्यातील हिंजवडीमधील आयटी पार्कमध्ये जवळपास इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांच्यासारख्या जवळपास १५० कंपन्या आहेत.या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांमध्ये रोज लाखो कर्मचारी कामासाठी येत असतात. त्यामुळे सहाजिकपणे इथल्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागते. त्यामुळे कामावार वेळेत पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. कामावरुन घरी जाताना देखील अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्यामुळे आयटी कंपन्यांनी आता हिंजवडीमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयावरुन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.  वाहतुकीच्या समस्यांमुळे आयटी कंपन्यांचे रोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन ठाकरे गटाने सत्ताधारी महायुती सरकावर टीका केली आहे. आधीचे बरेच उद्योग राज्याबाहेर गेल्याने आता आयटी कंपन्या परराज्यात जात असल्याने ठाकरे गटाने सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

"घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, याआधी देखील वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले होते. या प्रक्लपांवरुन देखील मोठ्या प्रमाणात राजकारण झालं होतं.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानUddhav Thackerayउद्धव ठाकरे