उद्धव, शिंदेंच्या नेतृत्वाची अगिAपरीक्षा
By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:05+5:302014-10-11T23:09:05+5:30
उद्धव ठाकरे यांच्यापुढे व ठाणो जिल्हा आजही भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापुढे या निवडणुकीत आहे.
उद्धव, शिंदेंच्या नेतृत्वाची अगिAपरीक्षा
>ठाणो : गेल्या 4क् वर्षात एकत्र असलेल्या सेना-भाजप यांनी परस्परांविरुद्ध निवडणुकीत उभे राहण्याची पहिलीच वेळ आणि शिवसेना प्रमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा स्वर्गवास आणि अटलजी, आडवाणी यांची अनुपस्थिती अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे जबरदस्त आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे व ठाणो जिल्हा आजही भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापुढे या निवडणुकीत आहे.
उद्धव आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बेरजेच्या राजकारणाचा जो प्रयोग केला. त्यासाठी प्रसंगी कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष पत्करला. बंड करू पाहणा:या या शिवसैनिकांना व नेत्यांना चुचकारले काहींना पुरस्कृत केले. या प्रयोगाची कसोटी देखील या निवडणुकीत लागणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीर्पयत मनोहर जोशींपासून ते अगदी अनंत तरेंर्पयत शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नेत्यांची जी फळी शिवसेनेत आघाडीवर होती, तिला आजवरचे राजकीय यश मिळवून देत होती. त्यातील सहा नेते स्वर्गवासी झालेले तर उर्वरित नेत्यांना उद्धवजींनी आपल्या दरबारातून दूर केलेले आणि नव्या नेत्यांची फळी साकारलेली अशा स्थितीत शिवसेनेतील ही नवी मांडणी सेनेला सत्ता आणि जनाधार मिळवून देण्यात कितपत यशस्वी होते. याचाही फैसला या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक शिवसेनेसाठी राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
आजवर निष्ठा आणि कडवटपणा याच भांडवलावर सेनेने राजकारण केले. परंतु हे भांडवल मोडीत काढून राजकीय आणि आर्थिक उपयोगिता असणा:या अन्य पक्षातील नेत्यांना शिवसेनेत प्रयत्नपूर्वक आणून मानाचे पान देण्याचा शिंदे यांचा एकनाथी व एकहाती प्रयोग कसा साकारतो व मतदार त्याचे कसे स्वागत करतात याकडेही जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. शिवसेना प्रमुखांच्या हयातीतही एवढी प्रचंड आव्हानात्मक निवडणूक सेनेला कधी लढावी लागली नव्हती. ते लढविण्याचे मोठे आव्हान उद्धवजी आणि त्यांचे एकनिष्ठ सरदार एकनाथ शिंदे यांच्यापुढे उभे ठाकले आहे. त्यांनी ठाणो महापालिकेतील सेनेची सत्ता कायम राखणो जिल्हय़ातील कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिकात असलेली सेनेची सत्ता टिकवणो व लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ातील चारही मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून आणणो अशी एकहाती किमया घडवून दाखविली. आता असेच यश ठाणो शहर आणि जिल्हय़ात शिवसेनेच्या उमेदवारांना मिळवून देण्यात ते यशस्वी होतात काय? याकडे संपूर्ण शिवसेनेचे लक्ष लागले आहे.
उद्धवजींनी शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात जी काही राजकीय मांडणी केली तिच्या सार्थतेवरही या निवडणुकीचा निकाल यशापयशाची मोहोर उमटविणार आहे. जर या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आली किंवा तो सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला तर उद्धवजींचे नेतृत्व या राजकीय प्रखर आव्हानाच्या मुशीतून तावून, सुलाखवून निघेल. तसेच जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याही नेतृत्वाची अगAीपरिक्षा त्यातून पार पडेल. त्यामुळेच ही निवडणूक केवळ महाराष्ट्रात सरकार कुणाचे? एवढय़ाच प्रश्नाचे उत्तर देणारी न ठरता शिवसेनेच्या भविष्यकाळाची विशेषत: तिच्या ठाणो जिल्हय़ातील राजकारणाची निश्चिती करणारी ठरणार आहे. त्यामुळेच मनसे किंवा भाजप हे शिवसेनेवर फारशी प्रखर टीका करीत नाहीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सेनेवर होणारी प्रखर टीका ही निवडणूक पश्चात आपल्याला सेनेची मदत घ्यावी लागणारच नाही अशी खूणगाठ बांधूनच केली गेली असल्याचे जाणवते.
4या विषयाच्या एकत्रित गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असा पूर्वीप्रमाणो असलेला निर्णय पुन्हा घेतला आहे.
4रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र या विषयांना लेखी परीक्षेत 25 टक्के गुण आवश्यकच असल्याची अट घातली होती.
4रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र या विषयांना लेखी परीक्षेत 25 टक्के गुण आवश्यकच असल्याची अट घातली होती.