शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 17:17 IST

रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून (Nanar Refinery Project) पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प हातातून गमावू नये, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पावर उदय सामंत यांची प्रतिक्रियामी त्याबद्दल काही बोलणार नाही - उदय सामंतदेशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणात - उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून (Nanar Refinery Project) पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प हातातून गमावू नये, असे म्हटले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. (uday samant react on nanar refinery project issue)

राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्या भूमिकेतून राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नाणार प्रकल्प नको, अशीच स्थानिकांची भूमिका आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. नाणार प्रकल्पाची गोष्ट शिवसेनेसाठी संपली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी"

मी त्याबद्दल काही बोलणार नाही

मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी तेथील ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे, त्याबद्दल काही बोलणार नाही. त्यान्नी त्यांची भूमिका मांडलेली आहे, असे सांगत रिफायनरी समर्थकांनी माझी भेट घेतली. जागेचा उपयोग तेथील लोकांना रोजगार निर्मितीसाठी झाला पाहिजे, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. 

देशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणात

देशातील एक मोठे इनोव्हेशन पार्क कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. रायगड जिल्हा केमिकल झोन असल्यामुळे तेथे केमिकल कंपन्या येतील. रत्नागिरी जिल्ह्यात सरकारकडून काही प्रकल्प राबविले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनावर आधारित प्रकल्प येतील. या माध्यमातून कोकणातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. मात्र नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्पRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाMNSमनसेPoliticsराजकारण