शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर आमच्याकडे असतील; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:55 IST

उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भाजपसोबत सरकार स्थापनेचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "उदय सामंत यांचा गौप्यस्फोट खोटा आहे. 2014 साली भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली. त्यानंतर भाजपने परत आमच्याबरोबर युती केल्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील झालो. 2019 साली भाजपने दिलेला शब्द पाळला नाही किंबहुना आमच्याशी त्यांची चर्चेची तयारी नव्हती. त्यामुळे भाजपबरोबर सरकार बनवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. कारण ते सरकार बनवायलाच तयार नव्हते", असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मंत्री उदय सामंत हे खोटं बोलत आहेत. उदय सामंत यांना पक्षात्तराचा अनुभव आहे, पण त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर आमचं सरकार स्थापन झालं तर ते आमच्या दारात असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही. एवढ्या पुरतंच त्याची राजकीय प्रगल्भता आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं. त्यामुळे ते म्हणत आहेत ते सर्वस्वी खोटं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर ते झाले असते, पण त्यांची भूमिका वेगळी असती. पण आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेस लोकं काम करत आहेत. अगदी अजित पवार यांच्यापासून सगळे प्रमुख म्हणजे, दिपील वळसे पाटीलही काम करत आहेत. पण त्यावेळी आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच हेका होता की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधान भवनात अध्यक्षांकडे सुनावणी पार पडत आहे. हिवाळी अधिवेशनामुळे सुनावणी नागपुरात सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची उलट तपासणी घेतली गेली. यादरम्यान, प्रश्नांना उत्तरं देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करु असे आश्वासन दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा