शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर आमच्याकडे असतील; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:55 IST

उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भाजपसोबत सरकार स्थापनेचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "उदय सामंत यांचा गौप्यस्फोट खोटा आहे. 2014 साली भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली. त्यानंतर भाजपने परत आमच्याबरोबर युती केल्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील झालो. 2019 साली भाजपने दिलेला शब्द पाळला नाही किंबहुना आमच्याशी त्यांची चर्चेची तयारी नव्हती. त्यामुळे भाजपबरोबर सरकार बनवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. कारण ते सरकार बनवायलाच तयार नव्हते", असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मंत्री उदय सामंत हे खोटं बोलत आहेत. उदय सामंत यांना पक्षात्तराचा अनुभव आहे, पण त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर आमचं सरकार स्थापन झालं तर ते आमच्या दारात असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही. एवढ्या पुरतंच त्याची राजकीय प्रगल्भता आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं. त्यामुळे ते म्हणत आहेत ते सर्वस्वी खोटं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर ते झाले असते, पण त्यांची भूमिका वेगळी असती. पण आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेस लोकं काम करत आहेत. अगदी अजित पवार यांच्यापासून सगळे प्रमुख म्हणजे, दिपील वळसे पाटीलही काम करत आहेत. पण त्यावेळी आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच हेका होता की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधान भवनात अध्यक्षांकडे सुनावणी पार पडत आहे. हिवाळी अधिवेशनामुळे सुनावणी नागपुरात सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची उलट तपासणी घेतली गेली. यादरम्यान, प्रश्नांना उत्तरं देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन करु असे आश्वासन दिले होते, असा मोठा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा