शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

गळती शोधण्यासाठी खोदले दोनशे खड्डे, पालिकेचा प्रताप

By admin | Updated: October 8, 2016 21:07 IST

मुंबईतील खड्ड्यांसाठी युटिलिटिज कंपनींना दोष देणाऱ्या महापालिकेने गळती शोधण्यासाठी एकट्या एच पश्चिम विभागात चक्क दोनशे खड्डे खणल्याचे उजेडात आले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 : मुंबईतील खड्ड्यांसाठी युटिलिटिज कंपनींना दोष देणाऱ्या महापालिकेने गळती शोधण्यासाठी एकट्या एच पश्चिम विभागात चक्क दोनशे खड्डे खणल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे हे खड्डे खणण्यासाठी पालिकेने तब्बल १५ कोटी मोजले व त्यानंतर ते बुजविण्याकरिता आणखी २० लाख खड्ड्यात घातले असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. 
 
यावर्षी मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपली आहे. तर मनसेने थेट रस्त्याच्या प्रमुख अभियंत्याला लक्ष्य केले. यावरुन मुंबईत खड्डे युद्ध सुरु आहे. करोडो रुपयांची रस्त्यांची कामं हाती घेऊनही मुंबई खड्ड्यात आहे. यासाठी ठेकेदार आणि अभियंत्यांना राजकीय पक्ष जबाबदार धरत आहेत. तर पालिका अधिकारी मुसळधार पाऊस, रस्त्यावर खोदले जाणारे चर यालाच दोष देत आहेत. 
 
मात्र पालिकेने मुंबई पाणी वितरण सुधारणा कार्यक्रम (एमडब्ल्युडीआयपी) अंतर्गत केलेल्या प्रयोगाने एच पश्चिम विभागाला खड्ड्यात घातले. एमडब्ल्युडीआयपीसाठी नेमलेल्या कंपनीने गळती शोधण्याच्या नावाखाली एच पश्चिम विभागात दोनशे खड्डे खोदले. यापैकी केवळ ८० ठिकाणी किरकोळ गळती आढळून आली. या कामासाठी सदर कंपनीला मोबदला म्हणून पालिकेने १५ कोटी रुपये दिले. तर हे खड्डे बुजविण्यासाठी २० लाख रुपये खर्च आल्याची माहिती, अभियंता संघटनेचे पदाधिकारी सुखदेख काशिद यांनी दिली. 
 
* एमडब्ल्युडीआयपी अंतर्गत मुंबईतील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा केली जात आहे. यासाठी टी म्हणजे मुलुंड आणि एच पश्चिम म्हणजे वांद्रे या विभागांमध्ये प्रयोग हाती घेण्यात आला. त्यानुसार या कंपनीने गळती शोधण्यासाठी दोनशे ठिकाणी रस्ते खोदले. प्रत्यक्षात केवळ ८० ठिकाणीच गळती तेही किरकोळस्वरुपाची पाण्याची गळती आढळून आली. 
 
* विशेष कार्य अधिकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांनी काढल्यानंतर त्याने संबंधित कंपनीमध्ये काम सुरु केले आहे. नियमानुसार पालिकेशी संबंधित कोणत्याही कंपनीमध्ये संबंधित अधिकारी काम करु शकत नाही. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अभियंता संघटनेचे पदाधिकारी सुखदेव काशिद यांनी केली आहे. 
 
* अभियंत्यांना प्रत्येकवेळीस खड्ड्यासाठी जबाबदार धरणाऱ्या महापालिकेने १५ कोटी अशाप्रकारे उडविल्याने याप्रकरणात न्यायालयात जाण्याचा इशारा काशिद यांनी दिला आहे.