शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

भिवंडीत खदानीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 23:14 IST

दोघे मित्रांसोबत गेले होते पोहोयला. मित्रांच्या माहितीनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाला दिली माहिती.

ठळक मुद्देदोघे मित्रांसोबत गेले होते पोहोयला.मित्रांच्या माहितीनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाला दिली माहिती.

भिवंडी : मित्रांसोबत खदानीच्या तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाकडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र अंधार पडल्याने शोधपथकाला शोधकार्य थांबवावे लागले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. 

मोहम्मद यासिम मोहम्मद ईस्लाम शेख ( वय-१५ वर्षे, रा. शांतीनगर) व मोहम्मद इम्रान वकिल अहमद खान ( वय १८ वर्षे, रा. गायत्री नगर ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे असून ते सायंकाळी मित्रांसोबत मस्करपाडा पोगाव येथील येथे असलेल्या एका खदानीच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यासीम व इम्रान या दोघांनी पाण्यात उडी घेतली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. 

मित्र पाण्यात बुडत असल्याने या दोघांसोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत मित्र बुडल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना दिली असता येथील नागरिकांनी अग्निशमन दलासह पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तालुका पोलीस व अग्निशमन दल दाखल होत दोन्ही बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी उशीर झाल्याने व अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीdrowningपाण्यात बुडणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल