शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 20:59 IST

...याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना, असे सामंत यांनी म्हटले आहे...

राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का...? अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर आता, शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 

राऊतांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सामंत म्हणाले, "विद्यमान मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) सांगितले गेले होते. त्यावेळी त्यांना ती नाकारलेली होती. म्हणजे, असे सांगितले जाते की, शंभूराज देसाई तेव्हा राज्यमंत्री होते आणि त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्याची काही गरज नाही." एवढेच नाही तर, "याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना," असेही सामंत म्हणाले, ते टीव्ही९ सोबत बोलत होते.

"यामुळे मला असे वाटते की, जर सुरक्षिततेत वाढ झाली असेल आणि ती तत्काळ पुरवण्यात आली असेल, तर हे सरकारचे मोठेपण आहे. कारण शेवटी देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या जीवावर उठत असेल अथवा त्यांना धमकी देत असेल, तर त्यांची सुरक्षितता वाढवणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे," असेही सामंत यांनी यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते राऊत? -

तत्पूर्वी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्‍यांपासून धोका आहे का...भविष्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना