शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 20:59 IST

...याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना, असे सामंत यांनी म्हटले आहे...

राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का...? अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर आता, शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 

राऊतांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सामंत म्हणाले, "विद्यमान मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) सांगितले गेले होते. त्यावेळी त्यांना ती नाकारलेली होती. म्हणजे, असे सांगितले जाते की, शंभूराज देसाई तेव्हा राज्यमंत्री होते आणि त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्याची काही गरज नाही." एवढेच नाही तर, "याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना," असेही सामंत म्हणाले, ते टीव्ही९ सोबत बोलत होते.

"यामुळे मला असे वाटते की, जर सुरक्षिततेत वाढ झाली असेल आणि ती तत्काळ पुरवण्यात आली असेल, तर हे सरकारचे मोठेपण आहे. कारण शेवटी देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या जीवावर उठत असेल अथवा त्यांना धमकी देत असेल, तर त्यांची सुरक्षितता वाढवणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे," असेही सामंत यांनी यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते राऊत? -

तत्पूर्वी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्‍यांपासून धोका आहे का...भविष्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना