शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 20:59 IST

...याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना, असे सामंत यांनी म्हटले आहे...

राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का...? अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर आता, शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 

राऊतांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सामंत म्हणाले, "विद्यमान मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) सांगितले गेले होते. त्यावेळी त्यांना ती नाकारलेली होती. म्हणजे, असे सांगितले जाते की, शंभूराज देसाई तेव्हा राज्यमंत्री होते आणि त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्याची काही गरज नाही." एवढेच नाही तर, "याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना," असेही सामंत म्हणाले, ते टीव्ही९ सोबत बोलत होते.

"यामुळे मला असे वाटते की, जर सुरक्षिततेत वाढ झाली असेल आणि ती तत्काळ पुरवण्यात आली असेल, तर हे सरकारचे मोठेपण आहे. कारण शेवटी देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या जीवावर उठत असेल अथवा त्यांना धमकी देत असेल, तर त्यांची सुरक्षितता वाढवणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे," असेही सामंत यांनी यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते राऊत? -

तत्पूर्वी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्‍यांपासून धोका आहे का...भविष्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना