शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

प्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही! - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:48 PM

मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

ठळक मुद्दे तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलननाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही.

नाशिक : देशाला आज पुन्हा क्रांतीची गरज वाटत आहे. राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टहिताच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहे; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गांधी संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यीक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरू उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्ववादी विचारधारेवर जोरदारी टीका करत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणा-यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही. गांधीजींच्या खूनाच्या खटल्याप्रसंगी आंबेकर कायदेमंत्रीपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणा-या वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुध्दी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करुन त्यांच्यावर अन्याय केला. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्पोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यांनी स्वाक्षरीराष्ट्रप्रेम व देशभक्तीमधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकिय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे तुषार गांधी यांनी यावेळी सांगितले.

‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतक-यांच्या समस्या ज्वलंतचंपारण्य  व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला मात्र त्यानंतरही शेतक-यांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहे. न्याय मागण्यांसाठी शेतकरी नाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतक-यांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलीत असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहे. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकMahatma Gandhiमहात्मा गांधीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती