शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना बदलीचे वेध

By admin | Updated: May 17, 2017 00:48 IST

जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या बदलीचे आदेश धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषद : दोन दिवसांत आदेश धडकणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या बदलीचे आदेश धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने ३१ मे पूर्वीच सर्व बदल्या पूर्ण करण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता केवळ शिक्षकांच्या बदल्या होणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपाठोपाठ अधिकाऱ्यांनाही बदलीचे वेध लागले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदली आदेशाची प्रतीक्षा आहे. मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांची मुंबईला बदली झाल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप त्यांचे बदली आदेश धडकले नाही. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा बदलीस पात्र आहे. पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक आदींनीही विनंती बदलीसाठी रेटा लावला आहे. डीआरडीएमध्ये नव्यानेच एक सहायक गटविकास अधिकारी बदलून येणार आहे. येथून बदलून जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागीही नवीन अधिकारी रुजू होणार आहे. या बदल्यांमुळे नवीन पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही नवीन राहणार आहे. यामुळे प्रशासनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रतिनियुक्त्या केल्या रद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत आणि बांधकाम विभागातील प्रतिनियुक्त्या रद्द केल्या. गेले काही दिवस अनेक कर्मचारी बदली होऊनही प्रतिनियुक्तीच्या नावाखाली पंचायत आणि बांधकाममध्ये ठाण मांडून होते. काहींची बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता सीईओंना एका झटक्यात प्रतिनियुक्त्या रद्द करून मुक्कामी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी रवाना केले आहे. पाणी पुरवठा विभाग वाऱ्यावर जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग काही महिन्यांपासून वाऱ्यावर आहे. कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्याने प्रभारावरच उन्हाळ्यातील पाणी टंचाई निवारली जात आहे. अद्याप या विभागाला कार्यकारी अभियंता मिळालाच नाही. त्यामुळे पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत शासन, प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट होते.