शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

इज्जतीसाठी सराफांनी व्यवसाय करावा : रांका

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

महाबळेश्वरमध्ये सुवर्णकारांचे अधिवेशन : हॉलमार्कच्या सक्तीबाबतही मान्यवरांकडून नाराजी

महाबळेश्वर : ग्राहकाकडून एक रूपया घेतला तर ९५ पैशांचे नव्हे त्यांना एक रुपयाचे सोने द्या. आपला सर्व व्यवहार एक नंबरमध्ये करा. अनोळखी व्यक्तीकडून सोने घेऊ नका. केवळ पैशासाठी व्यवसाय न करता इज्जत कमावण्यासाठी व्यवसाय करा, असा सल्ला सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यावसायिकांना दिला. येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी झालेल्या सराफ असोसिएशनच्या अधिवेशनात ते बोलत होते. मेळाव्यास असोसिएशनचे उपाध्यक्ष पे्रम झांबड, मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष मुकेश संघवी, सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर पंडित, सुभाष ओसवाल, सुधाकर टाक उपस्थित होते. रांका म्हणाले, ‘काही मोठे ब्रॅण्ड आपल्या दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारत नाहीत. मग ही सक्ती लहान व्यापाऱ्यांवरच का केली जाते? जगात फक्त १९ देशांतच हॉलमार्क शिक्का सक्तीचा आहे. आपल्याकडे अपुऱ्या यंत्रणेमुळे अडचणी येतात. हॉलमार्कसाठी दागिने घेऊन जाताना दरोडे पडतात. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही शासनाचे डोळे उघडत नाहीत. आमची इमेज, गुडविल आणि स्टेटस हाच आमचा हॉलमार्क आहे. एक मिलीग्रॅम वजनी काटा सक्तीचा करणारा कायदा रद्द होणार असल्याचे रांका यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातून सुवर्णकार बंधुंनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे नको एक लाखापेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. ही सक्ती उठविली पाहिजे. एकीकडे सोने आयातीमुळे विदेशी चलन गुंतून पडते अशी ओरड केंद्र शासन करत आहे तर दुसरीकडे अशोकचक्र असलेले नाणे विक्रीसाठी शासनाच सोन्याची आयात करत आहे. तेव्हा विदेशी गुंतवणूक अडकून पडत नाही का, असा सवाल मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. अडचणी सोडविण्यासाठी एकत्र या व्यवसाय करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व सुवर्णकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दुकानात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवावे, असे मत सुधाकर टाक यांनी व्यक्त केले. यावेळी सराफांनी आपल्या व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणींबाबत मते मांडली. सावकारीपेक्षा नॉनबँकिंग फायनान्स करा सावकारी करण्यापेक्षा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन नॉन बँकिंग फायनान्सचा उपयोग करावा. कारण सावकारीमध्ये शासनाचे जाचक निर्बंध आहेत. उलट सावकारापेक्षा जास्त लाभ घेणारी फायनान्स कंपनीत सरकारचे नियंत्रण नाही, असे रांका यांनी स्पष्ट केले.