शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अन्य राज्यांमध्ये व्यापार खुला, महाराष्ट्रात जादा बंधनांमुळे नाराजी; व्यावसायिकांमध्ये कमालीची अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:21 IST

कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे.

यदु जोशी -मुंबई : देशातील महत्त्वाच्या काही राज्यांमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले असताना महाराष्ट्रातच कडक का, असा सवाल करीत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भातील तुलनात्मक माहिती सादर करण्यात आली आहे. तसेच दर दोन आठवड्यांनी आढावा घेण्याऐवजी कोरोना परिस्थितीचा दर आठवड्याला आढावा घेऊन निर्बंध शिथिल करा, अशी मागणीही होत आहे. (Trade open in other states, displeased with extra restrictions in Maharashtra; Extreme discomfort among professionals)कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. अत्यावश्यक व्यतिरिक्त असलेल्या दुकानांमध्ये एरवीदेखील प्रचंड गर्दी कधीही उसळत नाही. शिवाय तेथे जी काही गर्दी होईल तिचे नियोजन करून ती सुरू  करण्यास अनुमती दिली पाहिजे, अशी भूमिका असोसिएशनने या पत्रात घेतली आहे. सर्व प्रकारची दुकाने निदान रात्री ८ पर्यंत सुरू ठेवा, असे साकडे त्यांनी घातले आहे. 

उत्तर प्रदेशात शिथिलताउत्तर प्रदेशात कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त अन्यत्र निर्बंध शिथिल केले आहेत. मॉल्स आणि रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार रात्री ९ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने आणि बाजार हे सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याचीही अनुमती आहे. दिल्लीत मॉल्सना मुभादिल्लीमध्ये सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत बाजार, मॉल्स, बाजार संकुले आणि दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये शॉपिंग मॉल्स, विविध देवस्थाने यांच्यासह व्यायामशा‌ळांना सुरू ठेवण्याची अनुमती आहे. 

पंजाब, केरळची स्थिती पंजाबमध्ये १० जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार असला तरी काही निर्बंध शिथिल केले आहेत. बार, पब ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास अनुमती दिली. प. बंगालमध्ये खासगी आणि  सरकारी बसेस ५० टक्के क्षमतेने धावत आहेत. चालक, वाहकांना लसीकरण अनिवार्य आहे. सलून, पार्लर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांनी २४ जून रोजीच निर्बंध शिथिल केले. 

निर्बंध शिथिल कराकोरोना परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रुग्णांची व मृत्यूसंख्यादेखील कमी होत आहे. पूर्वीप्रमाणेच दर आठवड्याचे रुग्णसंख्येचे आकडे समोर ठेवून आढावा घ्यावा व निर्बंध कमी अधिक करावेत, अशी आमची मागणी आहे.     - बी. सी. भरतिया, अध्यक्ष,     कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सव्यापाऱ्यांची रोजीरोटी, त्यांच्याकडील कामगारांना पगार, दुकानांचे भाडे व इतर गोष्टींचा आर्थिक मेळ साधण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी किमान रात्री ८ पर्यंत दुकाने उघडी ठेण्याची परवानगी द्यावी.- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन- राज्यातील तब्बल ३० जिल्हे हे तिसऱ्या स्तरामध्ये आहेत आणि त्यानुसार तेथे कडक निर्बंध लागू आहेत. - रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे, मृत्यूही बोटावर मोजण्याइतकेच आहेत, असे जिल्हे आणि जिथे हे आकडे झपाट्याने कमी झालेले नाहीत असे जिल्हे एकाच म्हणजे तिसऱ्या स्तरात आहेत. - कोरोनावर नियंत्रण मिळविणाऱ्या जिल्ह्यांनाही त्यामुळे निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार