शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 07:09 IST

चौकशीची मागणी : यवतमाळकरांना सध्याही मिळते सहा दिवसाआड पाणी

- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला २४ तास पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवून २०१७ मध्ये ३०२ कोटी रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. सध्या शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. काही भागांना तर ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तरीही योजना पूर्ण झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन उरकण्यात आले. चुकीची माहिती देणाऱ्या या अधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे आली आहे.

अमृत पाणीपुरवठा योजनेद्वारे यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०१७ मध्ये ही योजना हाती घेतली. पुढील ३० महिन्यात योजना पूर्ण करायची होती. प्रत्यक्षात प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ऑक्टोबर २०२४ मध्येही शहरातील विविध भागांना तब्बल सहा ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. बेंबळा धरण ते टाकळी फिल्टर प्लांट ही १८ किलोमीटर लांबीची मुख्य पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटल्याने ती बदलण्याची नामुष्की ओढवली. त्यातच शहराअंतर्गतची पाइपलाइनही निकृष्ट निघाल्याने आजही जागोजागी पाण्याची गळती होत आहे.

दुसरीकडे योजनेसाठीची यंत्रसामग्रीही अल्पावधीतच कुचकामी ठरत आहे. अशा दुष्टचक्रात ही योजना अडकली असताना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या योजनेचे अचानकपणे उद्घाटन झाले. उद्दिष्टाप्रमाणे योजना पूर्ण झालेली नसताना पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून नेमके काय साधले, असा प्रश्न आता यवतमाळकरातून केला जात आहे. पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधी अशा काही बाबी या राजकारणाच्या पलीकडे असतात. मात्र, यवतमाळ शहराला थेंबभर पाणी मिळत नसताना काही जणांकडून याचंही राजकारण केले जात असल्याची शहरात चर्चा आहे. सरकारच्या योजना योग्य पद्धतीने राबवायच्याच नाही, असा चंगच जणू यवतमाळमध्ये बांधल्याचे दिसत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचीही तब्बल साडेचार हजार घरकुले जिल्ह्यात रखडलेली आहेत. दरम्यान अमृत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाबाबत पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी करण्याची मागणी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

३०२ कोटी रुपये खर्चून काय साधले?या योजनेच्या पूर्वी यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह येथून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आता योजनेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केल्यानंतरही शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी पाणीपुरवठा योजनेसाठी दरमहा ८० लाखांचे वीजबिल यायचे. ते आता सव्वा कोटींवर येत आहे. विशेष म्हणजे सध्या दररोज ६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा योजनेद्वारे केला जात असताना प्रत्यक्षात ३५ दशलक्ष घनमीटर पाणीच यवतमाळकरांच्या घरात पोहोचत आहे, तेही सहा ते आठ दिवसाआड. त्यामुळे ३०२ कोटी रुपये खर्चून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWaterपाणी