शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 07:09 IST

चौकशीची मागणी : यवतमाळकरांना सध्याही मिळते सहा दिवसाआड पाणी

- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला २४ तास पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवून २०१७ मध्ये ३०२ कोटी रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. सध्या शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. काही भागांना तर ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तरीही योजना पूर्ण झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन उरकण्यात आले. चुकीची माहिती देणाऱ्या या अधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे आली आहे.

अमृत पाणीपुरवठा योजनेद्वारे यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०१७ मध्ये ही योजना हाती घेतली. पुढील ३० महिन्यात योजना पूर्ण करायची होती. प्रत्यक्षात प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ऑक्टोबर २०२४ मध्येही शहरातील विविध भागांना तब्बल सहा ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. बेंबळा धरण ते टाकळी फिल्टर प्लांट ही १८ किलोमीटर लांबीची मुख्य पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटल्याने ती बदलण्याची नामुष्की ओढवली. त्यातच शहराअंतर्गतची पाइपलाइनही निकृष्ट निघाल्याने आजही जागोजागी पाण्याची गळती होत आहे.

दुसरीकडे योजनेसाठीची यंत्रसामग्रीही अल्पावधीतच कुचकामी ठरत आहे. अशा दुष्टचक्रात ही योजना अडकली असताना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या योजनेचे अचानकपणे उद्घाटन झाले. उद्दिष्टाप्रमाणे योजना पूर्ण झालेली नसताना पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून नेमके काय साधले, असा प्रश्न आता यवतमाळकरातून केला जात आहे. पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधी अशा काही बाबी या राजकारणाच्या पलीकडे असतात. मात्र, यवतमाळ शहराला थेंबभर पाणी मिळत नसताना काही जणांकडून याचंही राजकारण केले जात असल्याची शहरात चर्चा आहे. सरकारच्या योजना योग्य पद्धतीने राबवायच्याच नाही, असा चंगच जणू यवतमाळमध्ये बांधल्याचे दिसत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचीही तब्बल साडेचार हजार घरकुले जिल्ह्यात रखडलेली आहेत. दरम्यान अमृत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाबाबत पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी करण्याची मागणी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

३०२ कोटी रुपये खर्चून काय साधले?या योजनेच्या पूर्वी यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह येथून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आता योजनेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केल्यानंतरही शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी पाणीपुरवठा योजनेसाठी दरमहा ८० लाखांचे वीजबिल यायचे. ते आता सव्वा कोटींवर येत आहे. विशेष म्हणजे सध्या दररोज ६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा योजनेद्वारे केला जात असताना प्रत्यक्षात ३५ दशलक्ष घनमीटर पाणीच यवतमाळकरांच्या घरात पोहोचत आहे, तेही सहा ते आठ दिवसाआड. त्यामुळे ३०२ कोटी रुपये खर्चून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWaterपाणी