शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 07:09 IST

चौकशीची मागणी : यवतमाळकरांना सध्याही मिळते सहा दिवसाआड पाणी

- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला २४ तास पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवून २०१७ मध्ये ३०२ कोटी रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. सध्या शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. काही भागांना तर ऐन पावसाळ्यात टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तरीही योजना पूर्ण झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन उरकण्यात आले. चुकीची माहिती देणाऱ्या या अधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे आली आहे.

अमृत पाणीपुरवठा योजनेद्वारे यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०१७ मध्ये ही योजना हाती घेतली. पुढील ३० महिन्यात योजना पूर्ण करायची होती. प्रत्यक्षात प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ऑक्टोबर २०२४ मध्येही शहरातील विविध भागांना तब्बल सहा ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. बेंबळा धरण ते टाकळी फिल्टर प्लांट ही १८ किलोमीटर लांबीची मुख्य पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटल्याने ती बदलण्याची नामुष्की ओढवली. त्यातच शहराअंतर्गतची पाइपलाइनही निकृष्ट निघाल्याने आजही जागोजागी पाण्याची गळती होत आहे.

दुसरीकडे योजनेसाठीची यंत्रसामग्रीही अल्पावधीतच कुचकामी ठरत आहे. अशा दुष्टचक्रात ही योजना अडकली असताना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या योजनेचे अचानकपणे उद्घाटन झाले. उद्दिष्टाप्रमाणे योजना पूर्ण झालेली नसताना पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून नेमके काय साधले, असा प्रश्न आता यवतमाळकरातून केला जात आहे. पिण्याचे पाणी, अन्नधान्य, औषधी अशा काही बाबी या राजकारणाच्या पलीकडे असतात. मात्र, यवतमाळ शहराला थेंबभर पाणी मिळत नसताना काही जणांकडून याचंही राजकारण केले जात असल्याची शहरात चर्चा आहे. सरकारच्या योजना योग्य पद्धतीने राबवायच्याच नाही, असा चंगच जणू यवतमाळमध्ये बांधल्याचे दिसत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचीही तब्बल साडेचार हजार घरकुले जिल्ह्यात रखडलेली आहेत. दरम्यान अमृत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाबाबत पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी करण्याची मागणी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

३०२ कोटी रुपये खर्चून काय साधले?या योजनेच्या पूर्वी यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह येथून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आता योजनेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केल्यानंतरही शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी पाणीपुरवठा योजनेसाठी दरमहा ८० लाखांचे वीजबिल यायचे. ते आता सव्वा कोटींवर येत आहे. विशेष म्हणजे सध्या दररोज ६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा योजनेद्वारे केला जात असताना प्रत्यक्षात ३५ दशलक्ष घनमीटर पाणीच यवतमाळकरांच्या घरात पोहोचत आहे, तेही सहा ते आठ दिवसाआड. त्यामुळे ३०२ कोटी रुपये खर्चून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWaterपाणी