शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:50 IST

युती सरकारवर टीका, ठाण्यासह कल्याणातही जाहीर सभा

कल्याण : शिवसेना-भाजपाचा कारभार म्हणजे आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा असा सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. एकीकडे बॉम्ब बनविणारे पकडले जातात तर दुसरीकडे सनातन संस्थेची पाठराखण करण्याचे काम सरकार करीत आहे. अशा देशद्रोहींना अभय देणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केले.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या कल्याण येथील सभेत चव्हाण यांनी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीतही गुंडगिरी वाढली आहे. धनंजय कुलकर्णीकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी विखे पाटील यांनी केला.तत्पूर्वी प्रमुख वक्ते सभेच्या ठिकाणी यायच्या आधी व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवरून झालेल्या वादात प्रकाश मुथा आणि संजय दत्त गट आमनेसामने आले.‘छत्रपतींची उंची गाठण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील’ठाणे: पाच वर्षांत काहीच न केलेल्या सरकारने फक्त पेपरमध्ये मोठ-मोठ्या जाहिराती केल्या. ‘लेकर छत्रपती शिवाजी का नाम, चले चलो मोदी के साथ’ या जाहिरातीतून मोदी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्व:तशी तुलना क रतात, हे चुकीचे आहे. भाजपाला विनाश काले विपरीत बुध्दी सुचली आहे. ते आता शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना करण्याचे काम करीत आहेत. पण, शिवाजी महाराजांची उंची गाठण्यासाठी मोदींना अजून सात जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत टीका केली.ठाणे जिल्हा शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने राबोडीत जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टिका केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे कोकण प्रभारी बी.एस. संदीप, खासदार हुसने दलवाई, प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, शहराध्यक्ष मनोज शिंदे,आयोजक रविंद्र आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, कल्याण येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार रमेश पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते २00९ च्या निवडणुकीवेळी मनसेत, तर त्यानंतर भाजपामध्येही प्रवेश केला होता.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना