शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

जगाचा पोशिंदा संकटात, तीन वर्षांत दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:50 IST

राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे.

गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात  याच कालावधीत आॅक्टोबर अखेरपर्यंत ३ हजार १९०  कर्जबाजारी शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासनाच्याच अहवालात स्पष्ट झाले. दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

सलग दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज तसेच अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगावं कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा हा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा आहे. त्यामुळे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवली जाते. ३१ आॅक्टोबर २०१८ च्या अहवालानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात  ३१९० शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार, अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत १४ हजार ५१२ कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत.  यापैकी ६ हजार ४५१ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, ७ हजार ८७९ अपात्र ठरली.  १८२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

कर्जमाफीच्या १५३ दिवसांत ४९९ शेतकरी आत्महत्याशासनाने जून महिन्यात शेतकºयांचे कर्ज माफ करण्याचा निर्र्णय घेतला. १३ लाख ७६ हजार ९१० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले. या पाच महिन्याच्या काळात म्हणजेच १५३ दिवसांत ४९९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या काळात दर सात तासात एका शेतक-याने मृत्यूचा फास गळ्यात घातला आहे. जून महिन्यात ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे.

२००१ पासून १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्याविभागासह वर्धा जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यात ९३, फेब्रुवारी १०५, मार्च ११२, एप्रिल ८२, मे ९७, जून ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहेत. यामध्ये अमरावती विभागात ९०३, तर वर्धा जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. वातावरण बदलामुळे कृषिक्षेत्रच धोक्यात आले आहे. यावर शासनाचे प्रयत्न चुकीच्या दिशेने होतात. त्यामुळे खरा लाभार्थी वंचित राहून आर्थिक स्तर खालावला आहे. शेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी वरवरची मलमपट्टी न करता दीर्घकालीन उपाययोजना हव्यात. उद्धवराव फुटाणे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Farmerशेतकरी