शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

जगाचा पोशिंदा संकटात, तीन वर्षांत दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:50 IST

राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे.

गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात  याच कालावधीत आॅक्टोबर अखेरपर्यंत ३ हजार १९०  कर्जबाजारी शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासनाच्याच अहवालात स्पष्ट झाले. दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

सलग दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज तसेच अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगावं कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा हा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा आहे. त्यामुळे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवली जाते. ३१ आॅक्टोबर २०१८ च्या अहवालानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात  ३१९० शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार, अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत १४ हजार ५१२ कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत.  यापैकी ६ हजार ४५१ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, ७ हजार ८७९ अपात्र ठरली.  १८२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

कर्जमाफीच्या १५३ दिवसांत ४९९ शेतकरी आत्महत्याशासनाने जून महिन्यात शेतकºयांचे कर्ज माफ करण्याचा निर्र्णय घेतला. १३ लाख ७६ हजार ९१० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले. या पाच महिन्याच्या काळात म्हणजेच १५३ दिवसांत ४९९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या काळात दर सात तासात एका शेतक-याने मृत्यूचा फास गळ्यात घातला आहे. जून महिन्यात ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे.

२००१ पासून १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्याविभागासह वर्धा जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यात ९३, फेब्रुवारी १०५, मार्च ११२, एप्रिल ८२, मे ९७, जून ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहेत. यामध्ये अमरावती विभागात ९०३, तर वर्धा जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. वातावरण बदलामुळे कृषिक्षेत्रच धोक्यात आले आहे. यावर शासनाचे प्रयत्न चुकीच्या दिशेने होतात. त्यामुळे खरा लाभार्थी वंचित राहून आर्थिक स्तर खालावला आहे. शेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी वरवरची मलमपट्टी न करता दीर्घकालीन उपाययोजना हव्यात. उद्धवराव फुटाणे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Farmerशेतकरी