शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात साडेतीन तास युक्तिवाद; राज्यपाल आणि ठाकरेंच्या हेतूंवर वकिलांकडून शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 06:46 IST

सिंघवी यांनी दोन वेळा युक्तीवाद केला. पहिल्यांदा जवळपास ६८ मिनिटे व दुसऱ्यांदा पुन्हा अर्धा तास प्रतियुक्तीवाद करून त्यांनी राज्यपालांच्या एकूणच हेतूवर संशय उपस्थित केला.

नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावतीने ॲड. अभिषेक सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. सिंघवी यांनी दोन वेळा युक्तीवाद केला. पहिल्यांदा जवळपास ६८ मिनिटे व दुसऱ्यांदा पुन्हा अर्धा तास प्रतियुक्तीवाद करून त्यांनी राज्यपालांच्या एकूणच हेतूवर संशय उपस्थित केला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस दिल्यामुळे बंडखोर सेनेच्या सदस्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु या सदस्यांना आता १२ जुलैपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. या प्रकरणाचा निर्णय लागल्यानंतर बहुमत चाचणी होणे योग्य राहील. राज्यपालांनी लगेच ३० जूनला राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहे. 

युक्तिवादाची सुरुवात अभिषेक मनु सिंघवी यांनी केलीबंडखोर सदस्यांना उत्तर देण्यासाठी १२ दिवस देण्यात आले व राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ २४ तासांचा वेळ दिला. इतकी घाई कशासाठी? राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली नाही. परंतु विरोधी पक्षनेत्याशी चर्चा केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. राज्यपाल हे विरोधी पक्षनेत्याच्या सल्ल्याने काम करीत आहेत.बंडखोर आमदारांनी उपाध्यक्षावर अविश्वास दाखविलेल्या पत्रात केवळ ३४ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. हा ईमेल सुद्धा अनधिकृत आयडीवरून पाठविण्यात आला होता. त्यामुळे या पत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. ही पूर्णपणे पक्षविरोधी कारवाई आहे. यामुळे ते अपात्रतेच्या तरतुदीचा पूर्णपणे भंग केल्याचे स्पष्ट होते.सर्व निर्णय राज्यपालांच्या कार्यालयात होऊ नये, काही निर्णय विधिमंडळातच झाले पाहिजे. यामुळे लगेच बहुमत चाचणीची गरज नाही. एकतर अपात्रतेची नोटीस देण्यात आलेल्या आमदारांचा निर्णय व्हायला पाहिजे. लगेच बहुमत चाचणी झाली नाही तर काही आभाळ कोसळणार नाही.एकीकडे उपाध्यक्षांचे हात बांधले आहेत व दुसरीकडे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले जात आहेत.राज्यपालांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही, या युक्तीवादावर सिंघवी म्हणाले, राज्यपाल म्हणजे काही पवित्र गाय नाही. विधानसभेच्या उपाध्यक्षावर संशय निर्माण करायचा व राज्यपाल योग्य असल्याचा दावा करायचा हे योग्य नाही. राज्यपाल हे सुद्धा माणूसच आहेत.

काय आहे रेबिया प्रकरण?या युक्तिवादात दोन्ही बाजूंनी रेबिया प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. हे नबाम रेबिया प्रकरण आहे. रेबिया हे अरुणाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष होते. त्यावेळी काँग्रेसचे ४७ सदस्यांचे बहुमत होते व भाजपचे केवळ ११ सदस्य होते. परंतु भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षावर अविश्वास ठराव आणला. काँग्रेसच्या काही सदस्यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपला पाठिंबा दिला होता. यामुळे हे सरकार कोसळले होते.

बंडखोर आमदारांच्या वतीने नीरज किशन कौल व मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला- बहुमत सिद्ध करण्यास सांगणे हे राज्यपालांचे पवित्र कर्तव्य आहे. यापासून रोखणे हा लोकशाहीची थट्टा ठरेल. अपात्रतेचे प्रकरण उपाध्यक्षांसमोर प्रलंबित आहे. या कारणावरून बहुमत रोखता येणार नाही.- उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आलेला असताना त्यांच्या सभागृहातील स्थानाबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करू इच्छित नाही. याचा अर्थ त्यांनी सभागृहातील विश्वास गमावले असल्याचे स्पष्ट होते. कोणत्याही सरकारला बहुमत आहे की, हे सभागृहात सिद्ध करावे लागेल.- बहुमत चाचणी घेऊ नये, ही मागणी लोकशाही तत्वाशी प्रतारणी करणारी आहे. यामुळे उपाध्यक्षांना हटविल्यानंतर अपात्रतेच्या नोटीसवर निर्णय होणे हे न्यायोचित होईल, असा दावा कौल यांनी केला.- सिंघवी यांनी राज्यपाल नुकतेच कोविडमधून उठल्याचा उल्लेख केला होता. यावर बोलताना कौल म्हणाले, हा काय युक्तिवाद आहे. कोरोनातून उठल्यानंतर राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य बजावू नये काय?- एखाद्या सरकारला बहुमत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्यपालांच्या अधिकाराला आव्हान देण्याचे निकष हे याचिकाकर्ता ठरवू शकत नाही. उपाध्यक्षांनी बंडखोरांना २ दिवसांची मुदत दिली होती. आता तीच व्यक्ती २४ तासाची संधी दिली तर अन्याय झाल्याची भाषा करीत आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना