शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:40 IST

ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे.

शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरून, गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रामुख्याने युतीत काही बिनसले की काय? अशी चर्चा सुरू होती. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना फडणविसांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचे बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही', असे म्हटले आहे.  

"ये फेविकॉल का जोड है..."एकनाथ शिंदे म्हणाले, माझी आणि देवेंद्रजींची मैत्री आताची नाही. ती गेल्या १५ -२०  वर्षांपासून आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचं बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही.' तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, तुटणार नाही. काही लोक म्हणतात ही जय विरूची जोडी आहे. काही म्हणतात धरम-वीरची जोडी आहे. पण मी सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ती खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही आणि जे स्वार्थासाठी  एकत्र आले होते. त्यांना या जनतेनेच बाजुला करून टाकले आहे." 

आम्ही 'तो' मिठाचा खडा खड्यासारखा काढून टाकला -"ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे. बाळासाहेब आणि अटलजींचे विचार, प्रमोद जी, गोपिनाथ जी असतील आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. यात गेल्या वर्षापूर्वी टाकला होता पण आम्ही तो मिठाचा खडा खड्यासारखा काढून बाजूला टाकला आणि भक्कम युती झाली. लोकांच्या मातलं सरकार आम्ही स्थापन केलं. यामुळे कितीही कुणी म्हटलं तरी आमच्यात कसल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ शकत नाही. काहण हे एका विचाराचं सरकार आहे," असेही शिंदे म्हणाले. 

...त्या सर्व्हेत पंतप्रधान मोदींना 84 टक्के लोकांची पसंती - एवढेच नाही, तर "२०१९ रोजी सर्वसामान्यांनी शिवसेना भाजप युतीला मतदान केलं. पण सरकार वेगळ्याच लोकांबरोबर स्थापन झालं. पण गेल्या १०-११ महिन्यांपूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि या राज्यात सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं. यामुळे राज्य सरकारला काही लोक पसंती देत आहेत. राज्य सरकार लोकांनी पसंत केलंय. पण मला, या गोष्टीचा आनंद आहे की, त्या सर्व्हेत पंतप्रधान मोदींना तब्बल 84 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या देशाचा सन्मान जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे," असेही शिंदे म्हणाले  

...याचा अभिमान आम्हाला अधिक -"सध्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि ते केवळ देशातच नाही, तर संपूर्ण जगात आज लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याचा अभिमान आम्हाला अधिक आहे. यामुळे सत्ता वैगेरे यांचा कुणालाही मोह नाही. हा एकनाथ शिंदे काय? देवेंद्र फडणवीस काय? आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही करत आहोत आणि उद्याही करत राहणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही. आमचे पाय आजही जमिनीवर आहोत," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpalgharपालघरBJPभाजपाShiv Senaशिवसेना