शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:54 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचे पुरावे सादर केले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्याच्या कालावधीत अनेक मतदार नोंदवले गेले. एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी असल्याचे राहुल गांधींनी पुरावे दाखवले. राहुल गांधींच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना एकनात शिंदे म्हणाले, "मी एवढंच सांगतो की, जेव्हा ते हरतात... आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत. याचा अंदाज आता त्यांना लागलेला आहे. त्यामुळे हे सगळं रडगाणं सुरू आहे. एक परिस्थिती तयार करण्याचे काम सुरू आहे", अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदावर राहुल गांधींवर केली.  

मनमोहन सिंग सरकारच्या काळात सगळ्यात मोठा स्कॅम -शिंदे

शिंदे पुढे बोलताना म्हणाले, "ते म्हणतील की, 'आम्ही म्हणालो होतो की, हे असं असं चाललेलं आहे. यामध्ये घोटाळा झाला. मतदानामध्ये चोरी केली.' मी एवढंच म्हणेल की, त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठा स्कॅम... मनमोहन सिंग सरकारमध्ये निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. किती मोठा स्कॅम होता." 

"तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा. तुम्हाला काय अधिकार आहे मत चोरी म्हणण्याचा. जेव्हा हे हरतात, तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम या सगळ्यावर आरोप करतात. राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी यांना निवडणुकीचं, मतांचे आणि विरोधी पक्षनेतेपदाचे भान असायला पाहिजे", असे टीकास्त्र शिंदेंनी राहुल गांधींवर डागले.  

शिंदेंनी सांगितले वाढलेल्या मतांचे कारण

"हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान करत नाहीयेत. तर हा कोट्यवधी लाडक्या बहिणी, कोट्यवधी शेतकऱ्यांचा अपमान आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे. एक लाख १८६ बूथ महाराष्ट्रात आहेत. एका बूथवर ७० मतांचं मतदान जास्त झाले, तर ७० लाख मते जास्त होतात. लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनी ठरवलं की महायुतीला विजयी करायचं. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि हे ते मान्य करायला तयार नाहीत. राहुल गांधी फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहेत. जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले पाहिजे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी