शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच...", चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:08 IST

Chandrashekhar Bawankule : अमित शहा यांना तडीपार असं म्हटल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलं, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. या अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार यांनी आज उत्तर दिले आहे.

सुप्रीम कोर्टानं अमित शाह यांना तडीपार केलं होतं. मात्र तरीही तडीपार केलेल्या व्यक्तीला गृहमंत्री करण्यात आले, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. ते म्हणाले, "अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अमित शाह यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्यं करत आहे", असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, अमित शहा यांना तडीपार असं म्हटल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांनी लक्षणीय काम केलं आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविलं, देशातील अराजकता नियंत्रणात आणली, देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. असा पोलादी पुरुष देशाला मिळाला आहे. त्यामुळं शरद पवार आणि त्यांचे समर्थक सैरभैर झाले आहेत. देशातील सर्व न्यायालयांनी अमित शाह यांना निर्दोष घोषित केलं आहे. जे भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच अमित शाह यांना दोष देत आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?गेल्या रविवारी पुणे येथील बालेवाडी येथे भाजपचे राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन झाले. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं. जेव्हा जेव्हा राज्यात भाजपची सत्ता आली, तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते, तेव्हा मराठा आरक्षण जातं. २०१४ ला भाजप सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं, तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते असं अमित शाह म्हणाले होते.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपा